गिरीश महाजन म्हणाले,मागील विधानसभा निवडणुकीत आपल्याला थोडा फटका बसला. हरिभाऊ बागडे त्या निवडणुकीत अगदी थोड्या मतांनी पडले होते व ते का पडले ? कसे पडले ? याची सर्वांना कल्पना आहे कारण तिथे आपलेच घरभेदी बसले होते.आपल्याच घरभेद्यांनी आपलेच घर फोडले त्यामुळे आपल्या दोन जागा पडल्या परंतु आता आपण तसे होऊ द्यायचे नाही.मागील वेळी आपण जळगावातून ११ आमदार देऊ शकलो नव्हतो परंतु यावेळी आपण सर्वच्या सर्व जागा जिंकायच्या आहेत.महाजनांनी खडसेंचे नाव घेतलेले नसले तरी त्यांचा रोख एकनाथ खडसेंकडे होता असे बोलले जात आहे.एकेकाळी भाजपामधील दिग्गजांची जोडी म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद आता संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे.एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडल्यानंतर तर हा वाद आणखीच चिघळला.उत्तर महाराष्ट्रावरील राजकीय वर्चस्व हे त्यामागचे मुख्य कारण आहे.दरम्यान खडसे आता भाजपात परतणार आहेत.त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दोनदा भेट घेतली आहे.पक्षश्रेष्टींने त्यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला असून खडसे लवकरच भाजपात दाखल होतील.