यावेळी उटी जाणार की गुवाहाटी?

२०२२ रोजी सत्तातंर होत असताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार सूरत,गुवाहाटी आणि गोव्याला गेले होते त्यामुळे यावेळी निवडणुकीनंतर उटी जाणार की गुवाहाटी ? असा प्रश्न संजय शिरसाट यांना विचारण्यात आला यावर ते म्हणाले की,आम्हाला उटी किंवा गुवाहाटी कुठेही जाण्याची गरज भासणार नाही.आम्ही सगळे मुंबईतच जाऊन जीवाची मुंबई करू.आमदारांचा गटनेता निवडण्यासाठी सर्व आमदारांना एकत्र ठेवावे लागते त्यासाठी एकदाच हॉटेलवारी करावी लागेल.

अपक्ष आमदारांसाठी हेलिकॉप्टर,विमाने आधीच बुक

यंदाच्या निवडणुकीत अपक्षांचा आकडा मोठा असू शकतो अशी एक शक्यता आहे.निकालानंतर त्यांना लवकर मुंबई आणावे लागेल यासाठी हेलिकॉप्टर आणि विमाने बुक केल्याची चर्चा आहे यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले,महायुतीची सत्ता शंभर टक्के येणार आहेच पण शेवटच्या क्षणी जोखीम नको म्हणून काही खबरदारीचे उपाय राबवते.अपक्षांना संपर्क साधणे हा नियमित राजकारणाचा भाग आहे.अपक्षांना देखील याची जाणीव असते.