“वकील ते आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री… ” !! देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री !! विधीमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०४ डिसेंबर २४ बुधवार
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून भाजपाच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला.भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन केले आहे.राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होणार आहे व या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. मुख्यमंत्री पदाच्या चर्चेकरता केंद्रीय निरिक्षक आज मुंबईत आले.निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठरला तर उर्वरित भाजपाच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर अनुमोदन दिले त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे.
महायुती सरकारचा शपथविधी उद्या
महायुती सरकारचा शपथविधी येत्या ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात पार पडणार आहे व त्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून त्यावर पहिल्या रांगेत पंतप्रधान,राज्यपाल,मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची आसन व्यवस्था असेल तर मागे एका बाजूला मंत्री तर दुसऱ्या बाजूला काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची व्यवस्था करण्यात येणार आहे तर समोर सुमारे २५ हजार लोकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे.विशेष म्हणजे महायुतीला सत्तेवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांसाठी शपथविधीच्या ठिकाणी ‘लाडकी बहीण कक्ष’ उभारण्यात येणार असून तेथे १० हजार महिलांची व्यवस्था केली जाणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस हे ५ डिसेंबर (गुरूवार) रोजी मुंबईतील आझाद मैदान येते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची आज बुधवारी महाराष्ट्र भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने नेमणूक करण्यात आली यानंतर आता ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.आझाद मैदानावर होणार असलेल्या या शपथविधी सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित असणार आहेत व या सोहळ्याच्या आयोजनासाठी जोरदार तयारी केली जात आहे.दरम्यान आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण,गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाच्या कोर कमिटीची बैठक पार पडली यामध्ये भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महायुतीचे नेते राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांना साडेतीन वाजता भेटून सत्ता स्थापनेचा दावा करतील असे जाहीर केले.
देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरच्या धर्मपीठ येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द वयाच्या २२ व्या वर्षी नागपूरमध्ये नगरसेवक ते मुख्यमंत्रीपद अशी राहिली आहे.फडणवीसांच्या या राजकीय यशामध्ये त्यांच्या नेतृत्व गुण हेच कारणीभूत असल्याचे बोलले जाते.
१) वकिलीचे शिक्षण घेतलेले देवेंद्र फडणवीस यांची पार्श्वभूमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडली गेलेली आहे.राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस यांनी बुद्धिमत्ता आणि वाद-विवाद कौशल्याच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.फडणवीसांनी सलग सहा वेळा नागपूर दक्षिण पूर्व विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला असून यामधून फडणवीसांची या भागातील प्रसिद्धी आणि त्यांच्या कामाचा आवाका लक्षात येतो.
२) देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वडीलांना तुरूंगात टाकणार्या पंतप्रधानांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या ‘इंदिरा कॉन्व्हेट’ शाळेत जाण्यास नकार दिला होता.सरस्वती विद्यालयात शिकण्याचा निर्णय घेतल्यापासून सुरू झालेली फडणवीसांची राजकीय कारकिर्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचली आहे.वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी देवेंद्र फडणवीस नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले होते व त्यानंतर राज्यातील गुंतागुंतीची राजकीय परिस्थिती मोठ्या कौशल्याने हाताळत ते पुढे महाराष्ट्राचे दुसरे ब्राम्हण मुख्यमंत्री देखील बनले.
३) विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आरएसएसचे सह सचिव अतुल लिमये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक है तो सेफ है’ या घोषणेचा पुरेपूर वापर करून घेतला.मौलाना सज्जाद नोमानी यांच्या वोट जिहाद वक्तव्यानंतर त्यांनी निवडणुकीला ‘धर्म युद्ध’ असे म्हणत देत हिंदू मतदारांना आपल्याकडे खेचून आणले.
४) देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व गुणांमुळे त्यांनी राजकीय वर्तुळात मोठे नाव कमावले आहे व त्यांच्या नेतृत्वात भाजपाने विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.फडणवीस पहिल्यांदा २०१४ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले यावेळी त्यांना मराठा आरक्षण,समृद्धी महामार्गासारखे मोठ-मोठे प्रकल्प सुरू करणे अशा काही आव्हानांचा सामना करावा लागला.
५) देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळा उघड करून स्वत:ची योग्यता सिद्ध केली तसेच भ्रष्टाचाराविरोधातील त्यांची भूमिका देखील यामुळे सर्वांपुढे आली.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अनेक पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला.जलयुक्त शिवार योजना देखील फडणवीस यांनीच राज्यभर लागू केली आहे.
पुन्हा मुख्यमंत्रिपदासाठी निवड होताच फडणवीसांनी काढली पहाटेच्या शपथविधीची आठवण !!
विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक बहुमताविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की,२०१९ सालीदेखील जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता दुर्दैवाने जनतेचा कौल हिसकावून घेण्यात आला आणि त्या कळात जनतेबरोबर बेईमानी झाली.मी इतिहासात जाऊ इच्छित नाही,आपण नवी सुरूवात करतोय पण या गोष्टीचा नक्की उल्लेख करेन की,पहिल्या अडीच वर्षात वेगवेगळ्या पद्धतीने नेत्यांना,आमदारांना त्रास देण्यात आला अशाही परिस्थितीत अडीच वर्षात एकही आमदार किंवा नेता आपल्याला सोडून गेला नाही.या काळात सर्व नेते संघर्ष करत होते त्या संघर्षामुळेच २०२२ साली पुन्हा आपले सरकार तयार झाले आणि त्यातूनच महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले”.
मोदींनी सर्वोच्च सर्वोच्च पदावर तीन वेळा बसवले … !!
देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले असून मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची फडणवीसांची ही तिसरी वळ असणार आहे.२०१९ मध्ये अवघ्या ७२ तासांसाठी देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री बनले होते याचा उल्लेख करत फडणवीस यांनी पंतप्रधान मोंदींचे आभार मानले आहेत.ते म्हणाले की,“देशाचे पंतप्रधान मोदी यांचे मनापासून आभार मानतो,माझ्यासारख्या बूथचा कार्यकर्ता म्हणून ज्याने काम चालू केले अशा एका कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर तीन वेळा मोदींनी बसवले अर्थात एकदा ७२ तासांसाठीच होतो पण तरीही तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री होतो त्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसण्याचा मान मोदींनी दिला.हा पक्ष त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला त्यातूनच सामान्य कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे मिळाली,काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे मी मोदींचे आभार मानतो.पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचेही आभार मानतो”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.