सदरील घडलेली घटना अशी की,चक्रपाणी सुनील बारस्कर हा पवनचक्की कंपनीच्या गाडीवर चालक होता.पवनचक्की कंपनीचे काम बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सुरू आहे.नेहमीप्रमाणे काम संपवून ते सर्वजण बोलेरो जीपने (क्रमांक एमएच.२३ ए.यु. ८४८५) मातकुळीकडून जांबवाडी मार्गी जामखेडकडे येत होते. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि जांबवाडी जवळ रस्त्यालगत असलेल्या विहिरीत जीप पडली.यावेळी एकच मोठा आवाज झाला.जवळच रस्त्याचे खडीकरण काम सुरू असल्याने तेथील मजूर घटनास्थळी धावले व विहिरीत पडलेल्या चारही तरूणांना त्यांनी बाहेर काढले.चौघांना उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तत्पुर्वीच चौघांचाही मृत्यू झाला होता.अद्यापही बोलेरो गाडी विहिरीत आहे.या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती.वैद्यकीय अधिकारी डॉ.शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.