Just another WordPress site

पाडळसे येथील ग्रामसभेत स्वच्छता व बंद असलेल्या वित्त आयोगाच्या कामावरून ग्रामस्थ आक्रमक !!

सुरज सपकाळे,पोलीस नायक

पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :-

दि.२९ जानेवारी २५ बुधवार

तालुक्यातील पाडळसे येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत आवारात घेण्यात आली.यावेळी गावातील गटारीची नियमित स्वच्छता होत नसल्याने तसेच वॉर्ड नंबर पाच व वार्ड नंबर ४ महर्षी वाल्मिकी नगर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर होसिग सोसायटीच्या रस्त्यावरून गटारीचे सांडपाणी वाहत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे गटारीची त्वरित सफाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान पाडळसे गावात जल जीवन मिशन अंतर्गत लाखो रुपयाचा निधी शासनाकडून प्राप्त झाला असून या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला तसेच जलकुंभासाठी वर्षभरापासून मोठा खड्डा खोदण्यात आला आहे व या खड्ड्यात सांडपाणी साचले असून ग्रामस्थांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे तसेच हा खड्डा त्वरित बुजून दुसऱ्या ठिकाणी जलकुंभाचे बांधकाम करण्यात यावे असे ग्रामसभेत ठरले.गावातून जाणाऱ्या भुसावळ फैजपूर राज्य मार्गावर गतिरोधक नसल्याने नागरिक आणि विद्यार्थी यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो परिणामी गतिरोधक टाकण्यासाठी सरपंच यांनी त्वरित सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र द्यावे अन्यथा गतिरोधक न टाकल्यास येत्या आठ दिवसात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.यावेळी गावातील विकास कामांसाठी आलेल्या वित्त आयोगाचा निधीमधून गावातील वार्ड नंबर १ ते ५ त्वरित विकास कामे सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली असता सरपंच यांनी सांगितले की गावातील एका सदस्याने वित्त आयोगात भ्रष्टाचार झाल्याचा तक्रारी अर्ज जि प मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला असल्याने विकास कामे करता येत नाही यावर ग्रामसभेत ज्या कामाची तक्रार करण्यात आली आहे ते काम बंद ठेवून इतर विकास कामे गावात त्वरित सुरू करावी असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांच्या अंतर्गत वादातून गावामध्ये विकास कामे होत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला तर ग्रामसभेत जे सदस्य उपस्थित नसतात त्यांना अपात्र करण्यात यावे असा ठराव देखील मंजूर करण्यात आला.सदर ग्रामसभेत सरपंच गुणवंती पाटील,उपसरपंच अलका सोनवणे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.यावेळी ग्रामसभेत पार पडलेल्या चर्चेत माजी सरपंच ज्ञानेश्वर तायडे,माजी सरपंच खेमचंद कोळी,माजी सदस्य चिधू कोळी,वासुदेव कोळी,सय्यद रज्जाक, विठ्ठल कोळी,समाधान कोळी,सिताराम कोळी,राजेश तायडे,सूरज कोळी,कुंदन कोळी,संग्राम कोळी,भरत चौधरी यांनी सहभाग घेऊन गावातील समस्या मांडल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.