Police Nayak
Just another WordPress site
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

  • Wednesday, June 25, 2025

Police Nayak Police Nayak - Just another WordPress site

  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Police Nayak

“लाडकी बहीण योजना म्हणजे मतदारांना सरकारी पैशाने दिलेली लाच” !! राजू शेट्टी यांची टीका

राजकीय घडामोडी विशेषमहाराष्ट्र घडामोडी विशेष
By टीम पोलीस नायक On Feb 20, 2025 0

अलिबाग-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२० फेब्रुवारी २५ गुरुवार

लाडकी बहिण योजना ही सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केला आहे.लाडक्या बहिण योजनेमुळे किती योजनांना कात्री लावावी लागली हे सरकारने स्पष्ट करावे या योजनेमुळे सामाजिक योजनांना लाडकी बहिण योजनेचा फटका बसला असल्याची टिप्पणी त्यांनी केली ते अलिबाग येथे पिएनपी चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलत होते.गेल्या तीन वर्षापासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळालेले नाही. शेतकऱ्यांचे ठिबक सिंचनाचे अनुदान प्राप्त झाले नाही.सामाजिक योजनांना कात्री लावाची आणि सवंग प्रसिध्दी मिळेल अशा योजनांच्या पाठी धावायचे अशात हे सरकार फसले असल्याचा आरोप त्यांनी केला.लाडकी बहिण योजनेसाठी ४६ हजार कोटींचा खर्च केला जात आहे त्यामुळे आदिवासी,दलित,अल्पसंख्यांक योजनांना या योजनेचा फटका बसला असला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

संवेदनशील विषयांना हात घालून तरूणांची डोकी भडकवण्याचे काम सध्या सुरू आहे व यातून काही पक्ष स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आहेत.या तरुणांचे चळवळींच्या माध्यमातून प्रबोधन करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरही शेट्टी यांनी यावेळी भाष्य केले.शरद जोशी म्हणायचे नेता तस्कर आणि गुंड अफसर हे सामान्य माणसाचे शत्रु आहेत आता तशीच परिस्थिती आहे.राजकारण्यांनी गुंडाना संरक्षण द्यायचे,त्यांच्या भानगडींवर पांघरूण घालायचे,यातून अमाप पैसा गोळा करायचा आणि या पैश्यातून पुन्हा सत्ता मिळवायची.सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता मिळवायचा यात सामान्य माणूस पिचला जातो व बीडमध्ये सध्या हेच सुरू आहे.ही व्यवस्था उखडून टाकायची असेल तर तरूणांनी या विरोधात रस्त्यावर उतरले पाहीजे असेही ते म्हणाले.विक्रमी आणि पाशवी बहुमत मिळूनही सरकारला जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवता येत नाही हे त्यांचे दुर्दैव आहे त्यामुळे हे बहुमत बेगडी आहे.दोन महिने झाले तरी सरकारला आपली पकड प्रशासनावर बसवता आलेली नाही.अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यापलीकडे सरकारने काहीच केले नाही त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे.लोकांनी जनतेचा स्वाभिमान विकत घेणाऱ्यापासून सावध रहायला हवे आणि चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यायला हवेत असे शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

 

0
Share
टीम पोलीस नायक

Prev Post

पाडळसे येथे आरंभ पालक मेळाव्याचे आयोजन

Next Post

अंतर्नाद प्रतिष्ठानच्या उपक्रमातून शिवचरित्राचे तेज नव्या पिढीच्या मनामनांत रुजेल -आमदार अमोल जावळे यांचे प्रतिपादन

You might also like More from author
महाराष्ट्र विशेष

महाराष्ट्र राज्य अनुसुचित जमाती आयोगास मंत्रीमंडळाची मान्यता-भाजप राज्य अनुसुचित…

महाराष्ट्र घडामोडी विशेष

हिंगोली येथील नऊ बार,ढाबा व हॉटेलमालक यांचेवर पाणी पुरवठा प्रकरणी गुन्हे दाखल !!

राजकीय घडामोडी विशेष

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये…

महाराष्ट्र घडामोडी विशेष

शासनाने ई-बाईक टॅक्सी व पीएम ई-बस चालवण्याचा निर्णय मागे घ्यावा !! ऑटो रिक्शा…

Prev Next
Leave A Reply
Cancel Reply

Your email address will not be published.

Recent Posts

  • यावल शिवसेना (उबाठा) च्या वतीने शहरातील विविध नागरी समस्यांबाबत नगर परिषद प्रशासनाला निवेदन !!
  • ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ बैठकीत उडाला गोंधळ !! गटविकास अधिकाऱ्यांवर आमदार व अधिकाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी !!
  • दिव्यांग बाधवांच्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार-सीईओ मिनल करनवाल यांचे दिव्यांग बांधवांना आश्वासन !!
  • बुधगाव-अनवर्दे बस आगारातील हलगर्जीपणामुळे विद्यार्थी व प्रवाशांचे जीवन वाऱ्यावर !! चोपडा आगारातून बसेस सोडण्याची मागणी !!
  • यावल आठवडे बाजारात दुकाने लावण्यासाठी ओटे बांधणार-आ.अमोल जावळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाला अभिवचन !!

Recent Comments

  1. टीम पोलीस नायक on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
  2. Digambar Tayade on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
© 2025 - Police Nayak. All Rights Reserved.
Sign in
  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.