उत्तरप्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२३ फेब्रुवारी २५ रविवार
मधुचंद्रासाठी गोव्याला गेलेल्या पती-पत्नीमध्ये वाद झाला व त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली.या घटनेनंतर पतीला गोव्यात सोडून पत्नी विमानाने घरी परतली आहे. त्यानंतर तिने पतीसह सासरच्या लोकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.मला माझ्या पतीने मारहाण केली आणि ठार करण्याचा प्रयत्न केला असा आरोप या महिलेने केला आहे.उत्तर प्रदेशातल्या महाराजगंज या ठिकाणी एका जोडप्याचे लग्न झाले व त्यानंतर हे दोघेही मधुचंद्रासाठी गोव्याला गेले मात्र तिथे या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.त्यानंतर महिलेच्या पतीने तिला मारहाण केली.आज तकच्या वृत्तानुसार पीडिता उत्तर प्रदेशातील कोतवाली या ठिकाणी राहणारी आहे.तिने सांगितल्यानुसार १२ फेब्रुवारीला तिचे लग्न झाले.तिच्या पतीचे नाव रमेश असे आहे.लग्नानंतर पती रमेश आणि त्याच्या घरातल्यांनी माझा छळ केला असा आरोप आता तिने केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९ फेब्रुवारीला सदर जोडपे हे मधुचंद्रासाठी गोव्याला गेले होत यानंतर २२ फेब्रुवारीला म्हणजेच शनिवारी ही महिला रमेशला सोडून परतली कारण मधुचंद्राच्या वेळी पती रमेशने आपल्याला मारहाण केली आणि ठार करण्याचा प्रयत्न केला असा आरोप या महिलेने केला आहे.या सगळ्या घटना घडल्यानंतर २२ फेब्रुवारीला सदर महिला तिच्या माहेरी आली व तिचे सगळे म्हणणे ऐकल्यानंतर तिच्या माहेरच्या मंडळींनी तिचा पती रमेश आणि त्याच्या घरातल्या लोकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.रमेशने माझा गळा दाबून मला ठार करण्याचा प्रयत्न केला असा आरोप या महिलेने केला आहे.पोलीस अधीक्षक सोमेंद्र मीना यांनी सांगितले की नवविवाहितेच्या तक्रारीनंतर आम्ही हुंड्यासाठी छळ,मारहाण या प्रकरणांत रमेशसह एकूण सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी आम्ही पुढील चौकशी करत आहोत.या प्रकरणातील पीडितेचा पती रमेश हा पेशाने डॉक्टर आहे.या दोघांचे लग्न नुकतेच झाले होते.दोघेही मधुचंद्रासाठी गोवा या ठिकाणी गेले होते मात्र महिलेने पती रमेशकडून मारहाण,छळ होत असल्याचे तिच्या घरातल्या लोकांना सांगितले.ज्यानंतर तिला २२ तारखेला घरी बोलवण्यात आले. एखाद्या चित्रपटाची कथा वाटेल अशी काहीशी ही घटना आहे.पतीच्या छळाला आणि मारहाणीला कंटाळून ही महिला घरी परतली आहे.पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.