यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ फेब्रुवारी २५ सोमवार
तालुक्यातील सावखेडासिम येथे गावालगत असलेल्या शेत गट नंबर ८५ मध्ये गुरांच्या गोठ्याला आग लागून सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.
सावखेडा सिम येथील बिस्मिल्ला नबाब तडवी यांचे शेतात असलेल्या गुरांच्या गोठ्याला आज दि.२४ रोजी दुपारी अडीच वाजेची सुमारास अचानक आग लागून यात शेती उपयोगी अवजारे,मटेरियल पत्रांचे शेड,रासायनिक खताच्या ३० गोण्या,ठिबक नळ्या २५ बंडल,सुप्रीम पाईप दोन्हींची ५२ नग,सुप्रीम पाईप अळीचे इंची ७५ नग,दोन पंप फवारणी स्टार्टर,२ पाण्याची टाकी १००० लिटरची जाडी असे एकूण अडीच लाखाचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी निशांत मोहोळ यांनी केला आहे.यावेळी दहिगाव तलाठी मिलिंद कुरकुरे तसेच पोलीस पाटील पंकज बडगुजर,सामाजिक कार्यकर्ते अनिल बडगुजर,सेवानिवृत्त फौजी हुसेन तडवी यांचेसह अनेकांनी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले.यावल नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी तत्काळ बोलवण्यात आली होती.बिस्मिल्ला तडवी यांनी दि.२१ रोजी पीव्हीसी पाईप नुकतेच आणले होते ही आग अचानक कशी लागली ? याबाबत मात्र ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे.आगीचे नुकसान त्वरित द्यावे अशी मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे.