यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ मार्च २५ बुधवार
मानव व बिबट संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात आली असुन सद्य परिस्थितीला मागील चार दिवसापुर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एका सात वर्षीय आदिवासी बालकाचा दुदैवी मृत्यु झाल्याने आपल्या तालुक्यात विविध लोकवस्तीच्या ठिकाणी बिबटचा वावर दिसुन आल्याचे बोलले जात आहे.या पार्श्वभुमीवर नागरीकांनी खबरदारीचे कसे उपाय करावे ? याबाबत मानव व बिबट संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची खबरदारीबाबत वनविभागाकडून निर्देश जारी करण्यात आले असून याबाबतची माहिती यावल पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे यांनी नुकतीच दिली आहे.
तालुक्यात चार दिवसापुर्वी सात वर्षीय आदीवासी बालकाचा साकळी शिवारात बिबटयाने केलेल्या भ्याड हल्ल्यात मृत्यु झाला होता.या पार्श्वभुमीवर यावल पश्चिम वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्र आधिकारी सुनिल भिलावे यांनी निर्देश दिले आहे की,सर्वप्रथम नागरीकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये,रात्रीच्या वेळी एकट्याने शेत शिवारात,जंगलात,बिबटचा वावर असलेल्या क्षेत्रात जाऊ नये,शेतात काम करत असतांना समुहात व सतत आवाज करीत राहावे,मोबाईलवर गाणे लावावे,अचानक बिबट्या आपल्या समोर आल्यास घाबरून न जाता त्याकडे पाठ न करता हळूहळू त्या ठीकाणा हुन निघुन जाणे,बिबट्याचा पाठलाग करू नये,बिबट जर विहिरीत घरात किंवा जख्मी अवस्थेत आढळून आल्यास त्वरित वनविभागास कळविणे तसेच आपल्या कडील पाळीव प्राण्यांना बंदीस्त गोठयात ठेवावे अशा महत्वाच्या विविध सुचना पश्चिम क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे नागरीकांना सर्तक राहण्यासाठी दिल्या आहेत.