दरम्यान भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेत मशिदींमधील लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित केला होता.लाऊडस्पीकरमुळे होणारे ध्वनी प्रदूषण धोकादायक बनले आहे.मशिदींमध्ये लाऊडस्पीकर वाजतात ज्यामुळे लोकांना त्रास होतो ते खूप मोठ्या आवाजात असतात असे त्या म्हणाल्या होत्या.नियमांचे उल्लंघन करून लाऊडस्पीकरचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की,“केंद्र सरकार आणि न्यायालयाच्या आदेशानुसार प्रार्थनास्थळांवर लाऊडस्पीकरसाठी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करू नये.सकाळी लाऊडस्पीकरसाठी परवानगी असलेली आवाजाची मर्यादा ५५ डेसिबल तर रात्री ती ४५ डेसिबल आहे”.