२२ मार्च रोजी ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी मेळाव्याचे आयोजन !! मेळाव्यात उपस्थित राहण्याबाबत यावल तालुकाध्यक्ष नितिन सोनार यांचे आवाहन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० मार्च २५ गुरुवार
भारतीय समता परिषदच्या वतीने ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी जळगाव येथे दि.२२ मार्च २५ रोजी मानराज पार्क येथे महत्वपुर्ण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मेळाव्यास ओबीसी समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन समता परिषदचे यावल तालुका अध्यक्ष नितिन सोनार यांनी केले आहे.
यावल येथील तालुका सहकारी खरेदी विक्री शेतकी संघ या ठिकाणी अखिल भारतीय समता परिषदेची ओबीसी बांधवांसाठी बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. दरम्यान दि.२२ मार्च २५ रोजी जळगाव येथे ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार असून त्या मेळाव्याला जास्त जास्त संख्येने सर्व ओबीसी समाज बांधव कसे उपस्थित राहतील या संदर्भात विचार विनिमय व मेळावा यशस्वी करण्याबाबत कार्यपद्धतीचे नियोजन आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीत सर्वसामान्यांना सोबत घेऊन ओबीसी मोर्चाला उपस्थित राहून मोर्चा संपन्न करू असे मेळाव्याचे नियोजन ठरवण्यात आले.प्रसंगी समता परिषद यावल तालुकाध्यक्ष नितीन सोनार,चेतन आढळकर,किशोर माळी,डॉ.निलेश गडे,श्रीराम बडगुजर,अतुल बडगुजर,मनोज करणकर,ज्ञानेश्वर देशमुख,महेश गडे,सुधाकर धनगर,संजय फिरके,सुनील वारुळे,नरेंद्र शिंदे,योगेश वाणी,अनिल चौधरी,जयवंत माळी यांच्यासह मोठया संख्येने समाजबांधव उपस्थित होते.प्रसंगी बैठकीला उपस्थित मान्यवरांचे आभार चेतन अढळकर यांनी मानले.