“मोबाइल फोनच्या वापरामुळे १० वर्षांत पृथ्वीचा नाश होईल” !! बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केला दावा !!
प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान,कुमार कृष्ण मोहन उर्फ सुदय यादव यांना पीडीएस डीलर्सबद्दल प्रश्न विचारतांना मोबाइल फोन वापरत होते.हे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आणि सभागृहाला आठवण करून दिली की विधानसभेत मोबाईल फोनच्या वापरावर आधीच बंदी आहे.यावर नितीश कुमार यांनी सभापती नंदकिशोर यादव यांच्याकडे आक्षेप नोंदवला आणि म्हटले की,“सभागृहात मोबाइल फोनवर बंदी आहे.मी तुम्हाला विनंती करतो की जो कोणी, विधानसभेत मोबाइल फोन घेऊन येईल त्याला सभागृहाबाहेर हाकलून लावावे.”पुढे बोलतांना मुख्यमंत्र्यांनी मोबाइल फोनच्या अतिवापराच्या नकारात्मक परिणामांबद्दल इशारा दिला.ते म्हणाले “पूर्वी मी खूप मोबाइल वापरत होतो.मला लक्षात आले की पुढे याचा त्रास होईल म्हणून मी २०१९ मध्ये याचा अतिवापर थांबवला.जर हे असेच चालू राहिले तर पुढील १० वर्षांत जग संपेल,” असा दावा नितीश कुमार यांनी केला.दरम्यान बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांचे हे वक्तव्य खोडून काढले आहे.त्यांनी नितीश कुमारांच्या धाडसी दाव्यावर टीका करताना म्हटले की,“बिहारमध्ये असा “कॉम्प्युटर निरक्षर मुख्यमंत्री” असणे दुर्दैवी आहे.”