Just another WordPress site

दहिगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह बालविकास अधिकारी यांनी रोखला !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२८ मार्च २५ शुक्रवार

तालुक्यातील दहिगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा १९ वर्षीय तरुणांसोबत बालविवाह लावला जात असल्याची गुप्त माहिती यावल एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांना मिळाल्यानुसार त्यांनी तात्काळ आपल्या पथकासह दहिगाव येथे जाऊन सदर बालविवाह रोखण्याची कारवाई करण्यात आली असून सदर कारवाई ही काल दि.२७ मार्च गुरुवार रोजी सकाळी साडेदहा वाजता करण्यात आली आहे.दरम्यान सदरील अल्पवयीन बालविवाह प्रकरणी कायदेशिर कार्यवाही करीत सदर अल्पवयीन मुलीस बाल सरंक्षण समितीकडे सोपवण्यात आले आहे.

दरम्यान तालुक्यातील दहिगाव येथील पटेल मोहल्यामध्ये ज्ञानेश्वर गजानन पाटील वय १९ या तरुणासोबत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावला जात असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांना देण्यात आली.सदरहू बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी तातडीने दहिगाव येथे जाऊन १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा होत असलेला बालविवाह रोखला.तसेच सदर अल्पवयीन मुलगी व तरूण तसेच त्याच्या कुटुंबास यावल पोलीस ठाण्यात आणण्यात आले.सदर मुलगी ही नागपूर जिल्ह्यातील असून मुलीच्या विवाह होत असतांना तिच्यासोबत तिच्या कुटुंबातील कोणीच उपस्थित नसल्याचे बाल विकास प्रकल्पाधिकारी अर्चना आटोळे यांनी यावेळी सांगितले.तर कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करीत या अल्पवयीन मुलीस जळगाव येथील बाल सरंक्षण समिती बालसंरक्षण अधिकारी प्रतिक जगदीश पाटील व चाईल्ड लाईनचे कुणाल शुक्ला तसेच प्रसन्ना बागुल यांच्या पथकाला सोपवण्यात आले.संबधीत अल्पवयीन मुलीचे पालक बालसंरक्षण अधिकारी यांच्या संपर्कात आल्यावर बालक पालकांना सोपविण्याची पुढील कारवाई करण्यात येईल असे बालसंस्कार समितीच्या वतीने सांगितले जात आहे.दरम्यान बालविवाह लावण्याचे प्रकार हे यावल तालुक्यात सर्वाधिक असल्याची धक्कादायक व चिंताजनक माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधीत अधिकारी यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.