यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ मार्च २५ शुक्रवार
येथील शहरातील व परिसरातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रसिद्ध श्री बालाजी रथोत्सव आगामी काळात म्हणजेच पुढील महिन्यात १२ एप्रिल २५ शनिवार रोजी मार्गक्रमण करणार असून सदरील मार्गातील खड्डे डांबरीकरण करून बुजणेबाबत शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२८ मार्च शुक्रवार रोजी नगर परिषद मुख्याधिकारी निशिकांत गवई यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,पुढील महिन्यात दि १२ एप्रिल २५ शनिवार रोजी यावल शहरात यात्रा असून त्या निमित्ताने शेकडो वर्षाची परंपरा व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बालाजी रथ शहरातून निघत असतो.सदरील यावल रथोत्सव मार्गावर सर्वत्र लहान मोठे खड्डे पडले असून दरवर्षी यावल नगर परिषदच्या माध्यमातुन माती मिश्रित बारीक कच टाकून तात्पुरती डागडुजी केली जाते मात्र ही कच काही वेळातच वाहनाच्या वर्दळीमुळे निघून जाते व खड्डे आहे तसेच राहतात त्यामुळे श्रीच्या रथास मार्गक्रमणात खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होऊन अनेक अडचणी निर्माण होतात.तरी यावल शहरातील बेहेडे सूपर शॉपी ते नगर परिषद रस्ता,मेन रोड ते बोरावल गेट-देशमुख वाडा-वाचनालय-विठ्ठल मंदिर ते नपा ह्या मार्गावर डांबरीकरणाने येत्या आठ दिवसांत बुजवण्यात यावे अन्यथा तसे न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने तीव्र आंदोलन,उपोषण,धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.सदर मागणी शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,संतोष धोबी,शरद कोळी,पप्पू जोशी,योगेश चौधरी,योगेश राजपूत,प्रकाश वाघ,पिंटू कुंभार,विजू कुंभार,डॉ.विवेक अडकमोल,सुनील बारी,हुसेन तडवी,अझहर खाटीक,प्रवीण लोणारी आदीनी केली आहे.