Just another WordPress site

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मध्यरात्री २.३० वाजता मंजूर !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.०४ एप्रिल २५ शुक्रवार

गेल्या काही दिवसांपासून वक्फ सुधारणा विधेयकाची मोठी चर्चा सरु होती व या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण देखील पाहायला मिळाले.दरम्यान यानंतर अखेर लोकसभेत बुधवारी (२ एप्रिल) मध्यरात्री वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले.लोकसभेच्या पाठोपाठ राज्यसभेत देखील गुरुवारी (३ एप्रिल) रात्री १२ तासांच्या चर्चेनंतर मध्यरात्री २.३० वाजता वक्फ सुधारणा विधेयक १२८ विरुद्ध ९५ मतांनी मंजूर करण्यात आले आहे.वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत १२ तासांपेक्षा जास्त चर्चा झाली व या मॅरेथॉन चर्चेनंतर अखेर वक्फ विधेयक मंजूर करण्यात आले.या विधेयकाच्या बाजूने १२८ मते पडली तर या विधेयकाच्या विरोधात ९५ मते पडली आहेत.आता हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवले जाणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल.दरम्यान मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत बोलतांना विरोधकांवर जोरदार टीका केली असून त्यांनी म्हटले की,हे वक्फ सुधारणा विधेयक मुस्लिमांच्या विरोधात नाही तर फक्त वक्फ मालमत्तांचे कामकाजाच्या संदर्भात आणि व्यवस्थापना सुधारण्याच्या पार्श्वभूमीवर आहे तसेच हे विधेयक आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवले जाईल व त्यांनी अधिसूचना जारी केल्यानंतर हा कायदा लागू होईल असे मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडताना किरेन रिजिजू यांनी इंडिया आघाडी मुस्लिमांची दिशाभूल करत असून हे विधेयक मुस्लिम विरोधी नाही,ते गरीब मुस्लिमांच्या विकासासाठी आणले गेल्याचा दावा केला.आत्ता वक्फच्या ८.७२ लाख मालमत्ता आहेत.२००६ मध्ये सच्चर समितीच्या आकडेवारीनुसार वक्फच्या ४.९ लाख मालमत्ता होत्या व त्यातून १२ हजार कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते.आता तर वक्फची संपत्ती वाढली आहे त्यातून किती उत्पन्न मिळू शकते याचा विचार करा.या उत्पन्नातून गरीब मुस्लिमांचे कल्याण करता येऊ शकते असा युक्तिवाद रिजिजू यांनी केला.संसदेच्या दोन्ही सभागृहांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयक आणि मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक मंजूर करणे हे सामाजिक,आर्थिक न्याय,पारदर्शकता आणि सर्वसमावेशक विकासाच्या प्रयत्नात एक महत्त्वाचा क्षण असून हे विधेयक विशेषतः अशा लोकांना मदत करेल जे दीर्घकाळापासून बाजूला राहिले आहेत ज्यामुळे त्यांना संधी मिळण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे.संसदीय समितीच्या चर्चेत सहभागी झालेले आणि त्यांचा दृष्टिकोन मांडणाऱ्या व कायद्यांना बळकटी देण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व संसद सदस्यांचे आभार असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.संसदीय समितीला आपले मौल्यवान विचार पाठवणाऱ्या असंख्य लोकांचेही विशेष आभार त्यामुळे पुन्हा एकदा व्यापक चर्चा आणि संवादाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.अनेक दशकांपासून वक्फ व्यवस्थेची पारदर्शकता आणि जबाबदारीचा अभाव होता यामुळे विशेषतः मुस्लिम महिला,गरीब मुस्लिम,मुस्लिमांच्या हिताचे नुकसान झाले.संसदेने मंजूर केलेले कायदे पारदर्शकता वाढवतील आणि लोकांच्या हक्कांचे रक्षण करतील असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ विधेयकाला मंजुरी, पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एक महत्त्वाचा क्षण…”

Narendra Modi On Waqf Amendment Bill
वक्फ सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले असून यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल.दरम्यान मागील काही दिवसांपासून वक्फ सुधारणा विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच राजकारण तापले होते.वक्फ सुधारणा विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध दर्शवला मात्र अखेर हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात मॅरेथॉन चर्चेनंतर मंजूर करण्यात आले.दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ सुधारणा विधेयकावर आता प्रतिक्रिया दिली असून हे विधेयक सामाजिक,आर्थिक न्याय,पारदर्शकता आणि सर्वसमावेशक विकासाच्या प्रयत्नात एक महत्त्वाचा क्षण असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयक आणि मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक मंजूर करणे हे सामाजिक,आर्थिक न्याय,पारदर्शकता आणि सर्वसमावेशक विकासाच्या प्रयत्नात एक महत्त्वाचा क्षण आहे.हे विधेयक विशेषतः अशा लोकांना मदत करेल जे दीर्घकाळापासून बाजूला राहिले आहेत ज्यामुळे त्यांना संधी मिळण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे.संसदीय समितीच्या चर्चेत सहभागी झालेले आणि त्यांचा दृष्टिकोन मांडणाऱ्या व कायद्यांना बळकटी देण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व संसद सदस्यांचे आभार असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.संसदीय समितीला आपले मौल्यवान विचार पाठवणाऱ्या असंख्य लोकांचेही विशेष आभार. त्यामुळे पुन्हा एकदा, व्यापक चर्चा आणि संवादाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.अनेक दशकांपासून वक्फ व्यवस्थेची पारदर्शकता आणि जबाबदारीचा अभाव होता यामुळे विशेषतः मुस्लिम महिला,गरीब मुस्लिम,मुस्लिमांच्या हिताचे नुकसान झाले.संसदेने मंजूर केलेले कायदे पारदर्शकता वाढवतील आणि लोकांच्या हक्कांचे रक्षण करतील असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

आपण आता अशा युगात प्रवेश करणार आहोत जिथे चौकट अधिक आधुनिक आणि सामाजिक न्यायासाठी संवेदनशील असेल.मोठ्या प्रमाणात प्रत्येक नागरिकांच्या प्रतिष्ठेला प्राधान्य देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत अशाप्रकारे आपण एक मजबूत अधिक समावेशक आणि अधिक दयाळू भारत निर्माण करू शकतो अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.