Police Nayak
Just another WordPress site
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

  • Friday, August 15, 2025

Police Nayak Police Nayak - Just another WordPress site

  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Police Nayak

“कर्ज घेता अन पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता,त्या पैशांनी काय करता”? !! कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुनावले खडेबोल !!

राजकीय घडामोडी विशेषमहाराष्ट्र घडामोडी विशेष
By टीम पोलीस नायक Last updated Apr 5, 2025 0

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.०५ एप्रिल २५ शनिवार

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत येऊन आता जवळपास चार महिने झाले आहेत मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप देखील सरकार करत नसल्याचे पाहायला मिळत आहे.महायुती मधील भाजपा,शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते मात्र आता सरकार सत्तेत येताच सर्व घोषणा हवेतच विरल्या का ? असा प्रश्न विरोधक व सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल अशी आशा लागलेली असतांनाच काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी संदर्भात मोठे भाष्य करत शेतकऱ्यांनी आपआपले कर्ज भरण्याचे त्यांनी सांगितले यावरून अजित पवार यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली.यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना खडेबोल सुनावले असून ‘कर्ज घेता आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता,कर्जमाफीच्या पैशांनी काय करता ?’ असा अजब सवाल करत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावले आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की कर्जमाफी होऊ शकत नाही ? मग शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही ? असा सवाल एका शेतकऱ्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारला या प्रश्नाचे उत्तर देतांना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्या शेतकऱ्यालाच सुनावल्याचे पाहायला मिळाले.कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटले की,“मग जे नियमित कर्ज भरतात त्यांनी का बरे कर्ज भरावे ? कर्ज घ्यायचे आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहायची तोपर्यंत कर्ज भरायचे नाही” असे म्हणत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावले आहे.“मला एक सांगा,आता येथे मीडिया आहे.मीडियासमोर असे बोलत नाही पण तुम्ही मला सांगा. तुमची (शेतकऱ्यांची) कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचे तुम्ही काय करता ? शेतीमध्ये एक रुपयांची तरी गुंतवणूक करता का ? सरकार तुम्हाला आता शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे देणार आहे.सरकार तुम्हाला पाईपलाईनाला पैसे,सिंचनासाठी पैसे,शेततळ्यासाठी पैसे देणार आहे.सरकार भांडवली गुंतवणूक करते मग शेतकरी भांडवली गुंतवणूक करतात का ? शेतकरी म्हणतात पीक विम्याचे पैसे पाहिजे मग त्यातून साखरपुडे करा,लग्न करा” असे म्हणत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावले आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २८ मार्च रोजी एका कार्यक्रमात बोलतांना कर्जमाफीबद्दल भाष्य केले होते.अजित पवार म्हणाले होते की,“मी सभागृहात उत्तर देतांना देखील सांगितले होते की सगळी सोंग करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही.मी महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट सांगतो,३१ मार्चच्या आत आपआपले पीक कर्जाचे पैसे भरा” असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २८ मार्च २०२५ रोजी एका कार्यक्रमात केले होते.
0
Share
टीम पोलीस नायक

Prev Post

दहिगावातील काही भागात पाणीपुरवठा होत नसल्याबद्दल ग्रामस्थांची सरपंचांकडे तक्रार !! सरपंचांचे दोन दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन !!

Next Post

“पत्नीच्या हत्येसाठी पतीला झाली जन्मठेप !! मात्र चार वर्षांनी पत्नीच आढळली प्रियकराबरोबर !! पतीला भोगावा लागला नाहक तुरुंगवास !!

You might also like More from author
स्तुत्य उपक्रम विशेष

महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत १४ ऑगस्ट २५ रोजी “पसायदान” म्हणण्यात येणार…

महाराष्ट्र विशेष

महाराष्ट्र राज्य अनुसुचित जमाती आयोगास मंत्रीमंडळाची मान्यता-भाजप राज्य अनुसुचित…

महाराष्ट्र घडामोडी विशेष

हिंगोली येथील नऊ बार,ढाबा व हॉटेलमालक यांचेवर पाणी पुरवठा प्रकरणी गुन्हे दाखल !!

राजकीय घडामोडी विशेष

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये…

Prev Next
Leave A Reply
Cancel Reply

Your email address will not be published.

Recent Posts

  • “आपला दवाखाना” व “वर्धनी केंद्र” घोटाळा प्रकरणात दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन !! १५ ऑगस्ट रोजीचे आमरण उपोषण स्थगित !!
  • अवयव दान हे श्रेष्ट दान असुन अवयव दानातुन ती पुन्हा जिवंत राहू शकते !! जागतिक अवयवदान दिनानिमित्त गुरूजनांनी व्यक्त केल्या भावना !!
  • पाडळसे येथे तालुकास्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धा उत्साहाच्या वातावरणात संपन्न !!
  • यावल येथील इंग्लिश मेडीयम स्कुलमध्ये सहकारमहर्षी जे टी महाजन यांना १०१ व्या जयंती निमित्ताने श्रध्दांजली !!
  • डोंगर कठोरा येथे वरुण राज्याच्या कृपादृष्टी निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम !!

Recent Comments

  1. टीम पोलीस नायक on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
  2. Digambar Tayade on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
© 2025 - Police Nayak. All Rights Reserved.
Sign in
  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.