Just another WordPress site

डोंगर कठोरा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत प्रभातफेरीचे आयोजन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१६ एप्रिल २५ बुधवार

तालुक्यातील डोंगर कठोरा येथे शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन योजनेअंतर्गत आज दि.१६ एप्रिल बुधवार रोजी सकाळी ८.३० वाजता संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.या प्रभात फेरीत शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत घोषवाक्य व योजनेच्या ठळक माहितीबाबत घोषणा देण्यात आल्या.सदर प्रभात फेरीत अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेज,जिल्हा परिषद मराठी शाळेचे विद्यार्थी व गावकरी यांनी सहभाग नोंदविला.

   

दरम्यान यानिमित्ताने आयोजित प्रभातफेरी कार्यक्रमात ग्रामपंचायत कार्यालयापासून संपूर्ण गावात प्रभात फेरी काढण्यात आली व त्यानंतर गावबैठकीचे आयोजन करण्यात आले.सदर गावबैठक सभेत कृषी पर्यवेक्षक एन.जी.पाटील,कृषी सहाय्यक आर.बी.पवार व सविता पवार यांनी शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ या योजनेबाबत शासनाचे ध्येय व योजना याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली.यावेळी सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,डॉ.राजेंद्रकुमार झांबरे,चिंधू झांबरे,कृषी पर्यवेक्षक एन.जी.पाटील,कृषी सहाय्यक आर.बी.पवार व सविता पवार,रोजगार सेवक डिगंबर खडसे.शरद राणे,सुरेश झांबरे,विनोद राणे,प्रदीप पाटील,तुषार झोपे,प्रमोद झांबरे,धर्मेंद्र पाटील,रामचंद्र पाटील,भोजराज पाटील, विलास चौधरी,अनिल पाटील,कोमल चौधरी,सुपडू तडवी,रमेश खडसे,अरब तडवी,उपशिक्षक एन.व्ही. वळींकर,चेतन चौधरी,विवेक कुलट,रामेश्वर जानकर,आर. पी.चिमणकारे,पी.पी.कुयटे,सचिन भंगाळे,मनीषा तडवी,शुभांगीनी नारखेडे,मुख्याध्यापिका विजया पाटील,मोहिनी पाटील,कीर्ती महाजन,हर्षदा कोलते,जोत्स्ना भिरूड,अरुणा चौधरी,ज्योती कोलते,हलीमा तडवी यांच्यासह ग्रामस्थ या प्रभात फेरीत सहभागी झाले होते.दरम्यान शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन योजनेअंतर्गत आज दि.१६ एप्रिल बुधवार रोजी सकाळी प्रभातफेरी व गावबैठक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.तसेच या कार्यक्रम अंतर्गत दि.१५ एप्रील ते २१ एप्रिल २५ या कालावधीत श्रमदान,शिवार फेरी,माती परीक्षण,विहीर तपासणी असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी गावकरी व शेतकरी बांधव यांनी शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ या लोकसहभागीय कार्यक्रमात सहभागी होऊन शासन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी पर्यवेक्षक एन.जी.पाटील,कृषी सहाय्यक आर.बी.पवार व सविता पवार यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.