काश्मीर घटनेच्या निषेधार्थ यावल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ एप्रिल २५ गुरुवार
येथील शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने काश्मीर येथे अतिरिक्यांच्या भ्याड हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेला असुन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येवुन शिवसेना (उबाठा ) पक्षाच्या वतीने तहसिलदार मोहनमाला नाझीरकर यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
शिवसेना (उबाठा) ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,दि.२१ एप्रील रोजी काश्मीर खोऱ्यातील पहेलगाम भागात पर्यटकांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात निरपराध व निष्पाप पर्यटक नागरिकांचा गोळीबार करून भीषण हत्याकांड करून बळी घेतले होते त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे.यानिमित्ताने मृत भारतीय व परदेशी व्यक्तीना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.अनेक वर्षापासून जम्मू काश्मीरमधील खोऱ्यात आतंकवादी आपल्या जवानांवर व नागरिकांवर हल्ले करत असून ते शहीद होत आहे.केंद्र सरकार यात पूर्णतः अपयशी ठरले असून केंद्रीय गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे तसेच केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून अतिरेक्यांचा बिमोड करावा आणि पाकिस्तानला धडा शिकविला पाहिजे व त्या विरोधात ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावल शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने करण्यात आली आहे.दरम्यान अतिरेक्यांचा खात्मा करावा,काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करावी,केंद्रीय सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यात यावी व अपयशी केंद्र सरकारने राजीनामा द्यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.यावेळी मृत्युमुखी पडलेल्या शहीद नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत शहिदांच्या परिवारा प्रती संवेदना व्यक्त करण्यात आल्या.यावेळी शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,शरद कोळी,संतोष धोबी,पप्पू जोशी,सुनील बारी,योगेश चौधरी,योगेश राजपूत पाटील,प्रवीण लोणारी,सारंग बेहेडे,विनोद कोळी,हुसेन तडवी,विजू कुंभार,पिंटू कुंभार,सागर बोरसे आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.