सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :-
दि.२८ एप्रिल २५ सोमवार
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित “गाव चलो अभियान” अंतर्गत पाडळसे गावात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात गाव विकास,केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
दरम्यान कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक हिरालाल चौधरी यांनी गावकऱ्यांना संबोधित केले.त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की,गावांचा सर्वांगीण विकास हा भारतीय जनता पक्षाचा मुख्य उद्देश असून केंद्र सरकारच्या विविध योजना गावागावात पोहोचवणे आणि जनतेचा सहभाग वाढवणे हे आमचे ध्येय आहे असे प्रतिपादन केले.कार्यक्रमात योगराज बऱ्हाटे,उमेश पाटील, अविनाश कोळी,योगेश पाटील,भरत चौधरी,रजनीकांत पाटील,सुभाष भोई,यशवंत चौधरी,योगेश चौधरी,नितीन कोळी,प्रकाश कचरे,अरविंद पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी प्रधानमंत्री आवास योजना,स्वच्छ भारत अभियान,जल जीवन मिशन,डिजिटल इंडिया यांसारख्या महत्वाकांक्षी योजनांची माहिती दिली तसेच आगामी काळात गावासाठी आवश्यक असलेल्या कामांवर सविस्तर चर्चा झाली.गावकऱ्यांनीही आपल्या समस्या मांडल्या व शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला.कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन जनजागृती करण्याचा संकल्प केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगराज बऱ्हाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश पाटील यांनी मानले.गावातील विविध वयोगटातील नागरिक,महिला,युवक यांचा या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाच्या अखेरीस ‘विकसित गाव,सक्षम भारत’ या संकल्पनेने सर्वांनी एकत्रितपणे पुढे जाण्याचा निर्धार केला.