अंगावर हळद ओली आणि जवानाला बॉर्डरवर हजर राहण्यासाठी कॉल !! ऑपरेशन सिंदूरसाठी माझे कुंकू पाठवत असल्याची नववधूची प्रतिक्रिया !!
जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ मे २५ गुरुवार
लग्न झाल्यानंतर सर्वांना सुखी संसाराची आवड निर्माण होणे साहजिकच असून लग्नानंतर फिरायला जाणे व वैवाहिक जीवन सुखाने जगणे हे प्रत्येकाला आवडत असते मात्र याला उपवाद म्हणून जवान मनोज पाटील हे ठरले असून त्यांचा विवाह हा नुकताच ५ मे शनिवार रोजी झाला असून अंगावर हळद ओलीच असतांना त्यांना आठ तारखेला देश सेवेसाठी तात्काळ हजर राहण्याचा कॉल आला आहे.दरम्यान कुठलाही विचार न करता मनोज पाटील यांच्या अंगावरची हळद ओली असतांनाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह सदरील जवान मनोज पाटील हे आज दि.८ मे गुरुवार रोजी देशसेवेसाठी रवाना झाले आहेत.
दरम्यान देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने जवानांना त्वरित बोलाविण्यात आले असून मनोज पाटील यांनी कर्तव्यनिष्ठता दाखवीत व आपल्या सुखाचा त्याग करून देशसेवा हे कर्तव्य समजून व देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत लागलीच आज दि.८ रोजी गुरुवार सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.प्रसंगी लग्नाची मनोहर स्वप्ने, आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचे नियोजन,भविष्याबाबतच्या कल्पना या सर्व गोड क्षणांना तिलांजली देऊन मनोज ज्ञानेश्वर पाटील (खेडगाव नंदीचे) हे आज ८ मे रोजी हळदीचा रंग अंगावर असतानांच कर्तव्य बजावण्यासाठी सीमेवर रवाना झाले आहेत.दरम्यान नाचणखेड़े ता.पाचोरा येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर लुभान पाटील यांचा मुलगा मनोज पाटील यांचे लग्न ठरले व तद्नुसार लग्नासाठी सुटी घेऊन मनोज पाटील गावी आले व त्यांचा पाचोरा येथे लग्न सामारंभ आटोपण्यात आला.परंतु लग्न आटोपताच मनोज पाटील यांना कर्तव्याच्या ठिकाणी तात्काळ बोलाविण्यात आले असल्याने त्यांनी देखील देशसेवेला महत्व देऊन कर्तव्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.सदरहू कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतांनाच देशसेवेच्या कर्तव्यावर जावे लागल्याचा मला गर्व असून देशापेक्षा मोठे काहीही नाही अशी भावना मनोज पाटील यांनी व्यक्त केली आहे.मनोज यांची पत्नी यामिनी पाटील यांनी देखील या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रया दिली असून ऑपरेशन सिंदूरसाठी माझे कुंकू पाठवत असल्याची प्रतिक्रिया नववधू यामिनी पाटील यांनी दिली आहे.जवान मनोज पाटील यांच्या सदरील निर्णयाचे परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.