नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०९ मे २५ शुक्रवार
पाकिस्तान सोबत तणाव वाढलेला असतांनाच केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून लष्कराचे प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांना प्रादेशिक लष्करातील प्रत्येक अधिकारी आणि भरती झालेल्या प्रत्येक व्यक्तीला आवश्यक सुविधा देण्याचे अधिकार दिले आहेत त्यामुळे लष्कर प्रमुखांची ताकद वाढली आहे.दरम्यान पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले व या हवाई हल्ल्यात दहशतवाद्यांचे ९ तळ बेचिराख करून विजयी पताका रोवली आहे.प्रसंगी भारताच्या या बेधडक कारवाईने चिडलेल्या पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी भारताच्या १२ शहरांवर हवाई हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला खरा परंतु आपल्या वीर जवानांनी एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून हे सगळे हल्ले हाणून पाडले आहेत.यानंतर भारताने पाकिस्तान मधील काही शहरांवर ड्रोनच्या माध्यमातून प्रतिहल्ला चढवला परिणामी या सगळ्या घडामोडींमुळे भारत आणि पाकिस्तानचे संबंध अतिशय ताणले गेलेले आहेत व अशा परिस्थितीत राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत सैन्याची तत्परता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने लष्कर प्रमुखांना महत्त्वाचे अधिकार दिले आहेत.
दरम्यान केंद्र सरकारने आज दि.९ मे २५ रोजी एक अधिसूचना जारी केली असून लष्कर प्रमुखांना प्रादेशिक सेनेच्या नियमांच्या अंतर्गत विशेष अधिकार प्रदान करण्यात आल्या आहेत.या अधिसूचनेनुसार लष्कर प्रमुख आता प्रादेशिक सेनेच्या सर्व अधिकारी आणि जवानांना खालील उद्देशांसाठी बोलावू शकतात.
१. आवश्यक सुरक्षा प्रदान करण्यासाठी-स्ट्रॅटर्जिक ठिकाणे,संवेदनशील भागांची सुरक्षा निश्चित करणे.
२.नियमित लष्कराचे समर्थन-युद्ध,आपत्ती किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितींमध्ये नियमित लष्कराची क्षमता वाढवणे.