Just another WordPress site

यावल तालुक्यात १० ग्रामसेवकांच्या जागा रिक्त असतांना पुन्हा ६ ग्रामसेवकांच्या बदल्या तर मिळाले मात्र चार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१६ मे २५ शुक्रवार

तालुक्यात विविध ग्रामपंचायतीत सुमारे १० ग्रामसेवकांच्या जागा रिक्त असुन यात यावर्षी ६ ग्रामसेवकांच्या बदल्या करण्यात आल्या असुन मात्र केवळ चार ग्रामसेवकच अद्याप यावल पंचायत समितीला मिळाले असल्याने पुनश्च दोन ग्रामसेवकांच्या रिक्त झाल्याने १२ ग्रामसेवकांची यावल तालुक्याला गरज असुन ग्रामसेवकांच्या कमतरतेमुळे ग्रामीण पातळीवर गावांच्या विकासावर याचा मोठा परिणाम जाणवणार आहे.तरी गावांच्या विकासाचा समतोल राखण्यासाठी ग्रामसेवकांची रिक्त पदे भरण्याकरिता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी लक्ष द्यावे अशी मागणी तालुकावासीयांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान यावल पंचायत समिती अंतर्गत एकुण ८३ ग्रामपंचायत असुन या संपूर्ण ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभाराचे ओझे ग्रामसेवकांच्या डोक्यावर दिले आहे.यात एका पेक्षा जास्त ग्रामपंचायतचा कारभार करतांना ग्रामसेवकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.प्रशासकीय पातळीवरून ग्रामीण विकासाच्या योजना राबविल्या जातात व या ग्रामीण क्षेत्राच्या विकासाच्या योजनांची योग्यरित्या अमलबजावणी व्हावी याकरीता शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतसाठी ग्रामसेवक नेमणुकीस दिलेले आहेत.परन्तु यावल तालुक्यात ग्रामपंचायतीची संख्या अधिक असुन ग्रामसेवक पदाच्या सुमारे १० ते १२ जागा ह्या अद्यापपर्यंत रिक्त असल्याने याचा परिणाम ग्रामीण प्रशासकीय कामावर होता दिसत आहे.वर्षाचा मार्च महिना म्हटले म्हणजे प्रशासकीय बदल्यांचा हा महीना ओळखला जातो.यंदाही यावल पंचायत समितीच्या माध्यमातुन तालुक्यामधील काही ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्या आहेत यात बोरखेडा खु.च्या ग्रामसेविका रजीया तडवी,हिंगोणा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गणेश सुरळकर,कासव्याचे ग्रामसेवक प्रविण कोळी,साकळीचे चंदु सावकारे,दुसखेडयाचे नितिन महाजन आणि पाडळसा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक छत्रपाल वाघमारे यांच्या बदल्या झाल्या आहेत. तर बदली झालेल्या सहा ग्रामपंचायत पैक्की फक्त बोरखेडा खु.येथे कैलास मोरे हे ग्रामसेवक मिळाले असुन उर्वरीत ५ पाच ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकपदाच्या जागा अजुन रिक्त आहे त्यामुळे यावल तालुक्यात ग्रामसेवकांच्या रिक्त झालेल्या जागांची संख्या आता १२ वर पहोचली आहे.या सर्व विषयाला जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी गांर्भीयांने लक्ष दिल्यास हा रिक्त जागांचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा तालुक्यातील ग्रामस्थ मंडळीकडून करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.