यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ मे २५ गुरुवार
तालुक्यातील सावखेडा सिम व परिसरात गेल्या चार पाच दिवसांपासुन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असुन अनेक ठिकाणी झाडे व विद्युत तारे तुटून पडले असुन यातच गावाबाहेरच्या परिसरात चालत असलेल्या बैलाचा स्पर्श वीजपुरवठा करणाऱ्या खांबाला झाल्याने तो जागीच मरण पावल्याची घटना काल दि.२८ रोजी सकाळी घडली.याबाबत सावखेडा सिम येथील निजाम गंभीर तडवी यांच्या वतीने यावल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान निजाम तडवी हे शेतकरी सकाळी साडेनऊ वाजता त्याचे खड्यात बैलांना पाणी पाजण्यासाठी गेले असता पाणी पाजून खळ्यात जात असतांना बैलाच्या शेपूटीचा स्पर्श वीज प्रवाह उतरलेल्या खांबाला झाल्याने पंचवीस हजार रुपये किमतीचा बैल विजेचा धक्का लागून मरण पावला आहे.सदरच्या या घटनेचा पंचनामा पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील व सहकारी पोलीस कर्मचारी करीत आहेत.सदरील शेतकऱ्याला विजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थ मंडळी कडून होत आहे.