Just another WordPress site

गटनिदेशक पद “निवड यादी”चा घोळ !! लायक उमेदवाराला डावलून उमेदवाराची नियुक्ती !! !! “लायक उमेदवाराला डावलून ‘अपात्र’ उमेदवाराची नियुक्ती” !!

शासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पात्र उमेदवार जगदीप बोरसे २० वर्षांपासून निवडीच्या प्रतीक्षेत !!

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.३० मे २५ शुक्रवार

उपसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय प्रादेशिक कार्यालय मुंबई यांच्या वतीने सन २००३-०४ या कालावधीत प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त -इ मा व संवर्गातील गटनिदेशक या पदाची एक जागा भरण्याकरीता ३०/०८/२००३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.यात सदर पदाच्या निवड प्रक्रियेत जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथील कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पात्र उमेदवार पातोंडा ता अमळनेर येथील रहिवाशी व सध्या चोपडा येथे वास्तव्यास असलेले जगदीप हिंमतराव बोरसे यांना डावलण्यात आले आहे.सदरहू गेल्या २० वर्षांपासून जगदीप बोरसे हे आपल्या निवडीच्या प्रतीक्षेत असून आजपावेतो शासनस्तरावरून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन संबंधित अधिकाऱ्याला वाचविण्याच्या नादात “चोर सोडून संन्याशाला फाशी” देण्याचे काम करण्यात आले असून हि बाब आजपर्यंत त्यांनी विविध अधिकाऱ्यांना विचारलेल्या माहितीच्या अधिकारातून उघड झालेली आहे.परिणामी यात लायक उमेदवार जगदीप हिंमतराव बोरसे यांना डावलून अपात्र उमेदवार किशोर गोविंदा निंबाळे यांची गटनिदेशक पदी नेमणूक करून जगदीप बोरसे यांच्यावर अन्याय होत असल्याची बाब माहिती अधिकारातून निष्पन्न झाली आहे.तरी माझ्या नियुक्तीपासून तर आजपर्यंत माझ्या वेतनाचे पैसे मला मिळावे तसेच माझी संबंधित ठिकाणी गटनिदेशक पदी निवड करून सेवेत सामावून घ्यावे त्याचबरोबर सदरील घोळ करण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येऊन मला न्याय देण्यात यावा अशी मागणी जगदीप हिंमतराव बोरसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

दरम्यान जगदीप हिंमतराव बोरसे यांना उपसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय प्रादेशिक कार्यालय मुंबई यांच्याकडून पत्र क्रमांक:प्राकामुं/आस्था/नेमणूक/३०७७४/का-१ दिनांक :- २१ डिसेंबर २००४ नुसार गटनिदेशक या मागासवर्गीय आरक्षित असलेल्या पदावर अनुशेषानुसार मागासवर्गीय विशेष भरती मोहिमेअंतर्गत १ सप्टेंबर २००४  रोजी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई-१ येथे जगदीप बोरसे यांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली असून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई-१ यांनी मुंबई विभागात मागासवर्गीय अनुशेषांतर्गत इ मा व,प्रकल्पग्रस्त साठी रिक्त असलेल्या गटनिदेशक या पदावर निवड करण्यात आली असल्याचे पत्र क्र.११/आस्था/०३-०४/अपदे/६७७,दि.०२/११/२००४ नुसार देण्यात आले असून त्या अनुषंगाने जगदीप बोरसे यांची नेमणूक मागासवर्गीय अनुशेषांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रानुसार औद्यागिक प्रशिक्षण संस्था नांदवी जि रायगड येथे नियुक्ती करण्यात आले असल्याचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.

यात प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते की,सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र.प्रकल्प-१०००.प्र.क्र.२७/२०००/१६-अ,दि.१३/०९/ २००० मध्ये यापुढे नियुक्त प्राधिकाऱ्यांनी उमेदवाराच्या परस्पर नियुक्त्या करू नये तर सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे रिक्त असलेल्या पदांपैकी प्रकल्पग्रतांमधून भरावयाच्या पदांसाठी मागासवर्गीयांच्या आरक्षणाला बाधा येणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असलेल्या प्रकल्पग्रतांच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची मागणी पदांच्या सेवा प्रवेश नियमानुसार करावी अशी कार्य पद्धती असतांना किशोर गोविंदा निंबाळे यांच्या नावाचा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या यादीत समावेश नसतांना परस्पर अर्ज स्वीकारून त्यांना प्रकल्पग्रस्त उमेदवार म्हणून गटनिदेशक पदावर नियुक्त करण्यात आले आहे.तसेच किशोर गोविंदा निंबाळे यांचा एकूण अनुभव २ वर्षे ९ महिने होत असल्यामुळे किशोर गोविंदा निंबाळे यांना अपात्र ठरविण्यात येत आहे कारण पदविकेकरिता एकूण किमान अनुभव हा ३ वर्षे असणे अनिवार्य असणे बंधनकारक असल्यामुळे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रानिमं.३००४ /प्र.क्र.३२/२००४.१३ अ मंत्रालय मुंबई ३२ दिनांक ९ जून २००४ रोजीच्या शासन निर्णयामधील आदेशाची पूर्तता किशोर गोविंदा निंबाळे यांनी केलेली नसल्यामुळे शासन आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे किशोर गोविंदा निंबाळे यांची नियुक्ती रद्द करण्यात आली असल्याची बाब शासकीय माहिती अधिकारात उघड झालेली आहे.परिणामी असे असतांना लायक उमेदवार जगदीप हिंमतराव बोरसे यांना डावलून अपात्र उमेदवार किशोर गोविंदा निंबाळे यांची गटनिदेशक पदी नेमणूक करून जगदीप बोरसे यांच्यावर अन्याय करण्यात आला असून गेली २० वर्षांपासून ते आपल्या अस्तित्वासाठी आजपावेतो जिकरीने लढा देत असून संबंधित अधिकाऱ्याला वाचविण्याच्या नादात एका निरपराध व्यक्तीला बळीचा बकरा बनविण्याचे काम हे विविध अधीकारी वर्गाकडून आजपावेतो करण्यात येत आहे.

दरम्यान उपसंचालक व्यवसाय व प्रशिक्षण कार्यालय नाशिक यांचे पत्र क्र.जा.क्र.प्राकाना/आस्थाअ-१ /२००३/१२६ दिनांक २७/०५/२००३ नुसार २७/१२/२००२ रोजीच्या मागणी पत्रानुसार जगदीप हिम्मतराव बोरसे नावाच्या उमेदवाराची प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या प्रतीक्षा यादीतील जेष्ठतेनुसार शिफारस करण्यात येत असून दि.१३ सप्टेंबर २००० रोजीच्या शासन निर्णयानुसार जगदीप बोरसे या उमेदवारास प्रकल्पग्रस्त दाखल्याच्या आधारे शासकीय नोकरी दिल्यावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा पुनर्वसन अधिकरी जळगाव यांना नेमणुकीची प्रत व नाव नोंदणी क्रमांकासह अवगत करण्याबाबत सुचविण्यात आलेले आहे.तसेच प्रत्यक्ष मुलाखतीच्या तक्त्यानुसार जगदीप बोरसे यांना सर्वात जास्त ७२.१२ गुण असल्याने गुणानुक्रमे प्रथम असल्यामुळे वस्तुस्थिती मध्ये गुणवत्तेनुसार गटनिदेशक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ निवड यादीत अनु.क्र.६ वरील जगदीप बोरसे यांचे नाव समाविष्ट करण्यात आले असल्याबाबत संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

परिणामी सदरील सर्व बाजू जगदीप बोरसे यांच्याकडून असून देखील संबंधित अधिकाऱ्यांना वाचविण्याच्या नादात जगदीप बोरसे यांची गटनिदेशक पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र देण्यात आलेले असतांना त्यांना सदरील निवडीचा विषय हा कौशल्य विकास व उद्योजकता विभागाशी संबंधित असल्याने कार्यवाही साठी सचिव कौशल्य विकास व उद्योजकता यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात उपलब्ध असलेल्या अभिलेखाच्या नस्तीमध्ये आपल्या दि.१२/०९/२००३ च्या नमुना अर्जासोबत दि.१५/१०/१९९७ निरीक्षण अहवालाची प्रत दिसून येत नाही.आपण मागणी केलेले निवडीबाबतचे दस्तऐवज अंशतः नष्ट झालेले असल्यामुळे त्यातील काही दस्तऐवजांची कालमर्यादा संपली नसली तरी आपणास उपलब्ध करून देणे शक्य झालेले नाही.दि.५ ऑगस्ट २०१० च्या उपशिक्षणार्थी व्यवसाय व प्रशिक्षण मुंबई यांच्या पत्रानुसार दि.२६/१०/२००७ च्या पत्रान्वये जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडून प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या यादीत जगदीप बोरसे यांचे नाव नव्हते हे अनावधानाने कळविले असल्याचे सांगण्यात आलेले आहे.तसेच जगदीप बोरसे यांना निवडीचे पत्र देण्यात आले असून जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडून प्राप्त झालेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या यादीत दिसून येत नाही अश्या येनकेन सबबी सांगून जगदीप बोरसे यांना आजपावेतो त्यांच्या हक्काच्या सेवेपासून टाळण्याचे कार्य (पाप) संबंधित अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.परिणामी जगदीप बोरसे हे आपल्या अस्तित्वाची लढाई तब्बल २०-२१ वर्षांपासून लढत असून या लढाईत अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे अस्तित्वाची लढाई लढण्यात असमर्थ ठरलेले आहेत.तरी संबंधित अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवून गेल्या वीस वर्षांपासून आपल्या नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या जगदीप बोरसे यांच्या अस्तित्वाचा व जीवनमरणाचा प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्यात यावा अशी आग्रही मागणी जगदीप बोरसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.