Just another WordPress site

डोंगरकठोरा येथे आमदार अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘महाराजस्व समाधान शिबीर’ यशस्वी !! शिबिरात तब्बल ८८८ लाभार्थ्यांनी घेतला विविध योजनांचा लाभ !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०२ जून २५ सोमवार

तालुक्यातील डोंगरकठोरा येथे आज दि.०२ जून सोमवार रोजी महसूल मंडळ भालोद अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर श्री खंडेराव मंदिर ट्रस्ट सभागृह डोंगरकठोरा येथे आमदार अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडले.सदर शिबिरात शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या या शिबिरात एकूण ८८८ लाभार्थ्यांना विविध सेवा देण्यात आल्या.या शिबिरात महसूल,निवडणूक,कृषी,पुरवठा,आरोग्य,महिला व बालकल्याण आदी विभागांनी सक्रिय सहभाग घेतला.तर सदर शिबिर हे “गोरगरिबांना थेट लाभ व तक्रारींचे त्वरित निवारण व सर्व सेवा एकाच ठिकाणी” हा या उपक्रमाचा उद्देश होता.

दरम्यान सदरील शिबिरात विभागनिहाय दिलेला लाभ पुढीलप्रमाणे आहे.यात महसूल विभाग:- जिवंत ७/१२ उतारे-१५२,ई-हक्क नोंदणी-१२८,म.ज.म.अ.१५५ अंतर्गत दुरुस्ती-१९,मतदार यादी सुधारणा:- नवीन नोंदणी (फॉर्म ६)-२२,मृत व्यक्तींची नावे कमी (फॉर्म ७)-१३,नाव दुरुस्ती (फॉर्म ८)-४,संजय गांधी निराधार योजना DBT लाभार्थी-१५२,आरोग्य तपासणी-५४,तालुका कृषी अधिकारी कार्यालय सेवा-३४,शिधापत्रिका लाभ (पुरवठा विभाग)-८४,सेतू केंद्राद्वारे:-उत्पन्न दाखले -६६,जातीचे दाखले-७२,वय/अधिवास/रहिवास दाखले-४५,इतर योजना:-जननी सुरक्षा योजना-२३,लेक लाडकी योजना-४,ICDS योजना-१६ अशा विविध योजनांच्या माध्यमातून तब्बल ८८८ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अमोल जावळे हे होते.प्रसंगी आमदार अमोल जावळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करतांना सांगितले की, “अंत्योदय हीच खरी सेवा” असून “अंत्योदय ही शासनाची खरी दिशा असल्याने प्रशासनातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवा पोहोचवली पाहिजे परिणामी हीच खरी लोकसेवा ठरेल तसेच शासनाच्या सर्व योजना पारदर्शकपणे व संवेदनशीलतेने जनतेपर्यंत पोहोचवा असे मार्गदर्शन केले. तर पैसे घेऊन काम करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही असा उपस्थित अधिकाऱ्यांना सज्जड इशाराच दिला.

शिबिरात आलेल्या ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाविषयी समाधान व्यक्त करत, सेवा वेळेवर व सोप्या पद्धतीने मिळाल्याचे सांगितले. हा उपक्रम “शासन आपल्या दारी” या संकल्पनेचा आदर्श ठरल्याचे उपस्थितांचे म्हणणे होते.उपविभागीय अधिकारी बबनजी काकडे तहसीलदार यांचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन दीपक गवई, व आभारप्रदर्शन नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांनी केले.

सदर शिबिरात प्रांताधिकारी बबनराव काकडे व तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी व तलाठी वर्ग तसेच विविध खात्याचे अधिकरी व कर्मचारी यांच्या यशस्वी आयोजनातून नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.यावेळी उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे व तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाने केलेल्या कार्याचे कौतुक केले.परिणामी मंडळातील ग्रामस्थांनी विविध योजना व दाखले मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.डोंगरकठोरा येथे राबविण्यात आलेले हे शिबीर “शासन आपल्या दारी” या संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव ठरला असून भविष्यातही अशी शिबिरे नियमित व्हावीत अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

यावेळी आमदार अमोल जावळे,उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे,तहसिलदार मोहनमाला नाझीरकर,आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार,गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड,वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे,निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते,महसूल नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे,संजय गांधी नायब तहसीलदार मनोज खारे,बालविकास अधिकारी अर्चना आटोळे,हर्षल पाटील,योगेश भंगाळे,सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,ग्रामपंचायत अधिकारी ए टी बगाडे,तलाठी गजानन पाटील,पोलीस पाटील राजरत्न आढाळे,ग्रामपंचायत सदस्य दिलीप तायडे,वेदुनाथ पाटील,चंद्रकांत भिरूड,गणेश जावळे,डिगंबर खडसे,विनोद राणे,दत्तात्रय गुरव,रुपेश पाटील,सचिन गुरव, मुस्तफा तडवी,तुषार झोपे,पुरुषोत्तम ठोंबरे,ज्ञानदेव खडसे,कावेरी कोळी,कीर्ती महाजन,हर्षदा कोलते,फरीदा तडवी,कल्पना राणे,यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा वर्कर,ग्रामपंचायत सदस्य,विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी,कृषी,महसूल,वन,वीज,आरोग्य,शिक्षण,पंचायत समिती अशा विविध कार्यायालया- तील  शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.