Just another WordPress site

बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरणाचा प्रश्न अंतिम टप्प्यात !! फैजपुर येथे केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांच्या उपस्थिती बैठक संपन्न !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०४ जून २५ बुधवार

गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबीत असलेल्या बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग एनएच ७५३ बी च्या चौपदरीकरणाचे काम हे शेवट्या टप्यात आले असून या संदर्भात शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आज दि.०४ जून बुधवार रोजी यावल (फैजपूर) येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले.

बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गातील २४० कि.मी अंतराच्या चौपदरीकरणास मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित प्रक्रियेस गती मिळाली आहे.तथापि यावरील जमिनी संपादन व इतर बाबींमुळे शेतकरी व स्थानिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर यावल येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,आमदार अमोल जावळे,भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी,उपविभागीय अधिकारी बबन काकडे, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व स्थानिक प्रशासन उपस्थित होते.सदर बैठकीत संबंधितांच्या समस्या व मागण्या ऐकून घेण्यात आल्या असून त्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिले आहे.या बैठकीस भाजपचे पदाधिकारी,कार्यकर्ते,चौपडा,यावल व रावेर तालुक्यातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.