यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्या.डॉ.संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत मोबाईल तंत्रज्ञान विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार,प्रा.ए.पी.पाटील उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.मनोज पाटील यांनी मोबाईल तंत्रज्ञान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करतांना भारतात ८० टक्के लोक स्मार्ट फोन वापरतात तर २० टक्के लोक साधा फोन वापरतात त्यामुळे मोबाईल ही प्रत्येकांसाठी काळाची गरज बनली असून वर्तमान युगात मोबाईल वापरतांना फायदे,तोटे ओळखुन काळजी घेतली पाहिजे असे त्यांनी नमूद केले त्याचबरोबर व्हाट्सअप ग्रुप,गुगल,फेसबुक,टेलीग्राम,मोबाईल बॅंकिंग,शेअर मार्केट,संदेश बॉक्स इ.आयकॉन बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य.संध्या सोनवणे यांनी मार्गदर्शन करतांना स्मार्ट मोबाईलही आजच्या ऑंनलाईन डिजिटल तंत्रज्ञाच्या युगातील महत्वाची गरज बनली आहे त्यामुळे मोबाईल स्लाईडवर येणारे टेक्स मॅसेज,बॅंक विषयक,वस्तू खरेदी विषयी येणारे अनपेक्षितपणे येणारे फोन याबाबत मोठ्या प्रमाणात फसवेगिरी होत असल्याने नेहमी सतर्क राहण्याबाबत आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गणेश जाधव यांनी केले तर आभार विद्यार्थी विकास विभागप्रमुख प्रा.डॉ.एस पी कापडे यांनी मानले.यावेळी प्रा.डॉ.एच जी भंगाळे,प्रा.आर डी पवार,प्रा.डॉ.पी व्ही पावरा,प्रा.डॉ.संतोष जाधव,प्रा.डॉ.निर्मला पवार,प्रा.डॉ.वैशाली कोष्टी, प्रा.सुभाष कामडी,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.छात्रसिंग वसावे,मिलींद बोरघडे,संतोष ठाकूर,प्रमोद जोहरे यांच्यासह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.