यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळा विटंबनेनंतर दोन गटात झालेल्या दंगलीतील आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्या.एस.एम.बनचरे यांनी दिले आहेत.
तालुक्यातील अट्रावल येथे बारागाडया ओढण्याची प्रथा असुन दि.३१ मार्च रोजी बारगाड्यांवर बसण्याच्या कारणावरून वाद झाला होता.सदरील वाद दि.१ एप्रील शनिवार रोजी उफाळुन आल्याने काही समाजकंटकांनी आंबेडकर नगरातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाची विटंबना केल्याने त्याचे पर्यावसन दंगलीत झाले होते.यानंतर झालेल्या दंगलीतील चार जणांच्या फिर्यादीवरून २०५ संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान पोलीस अधिक्षक एम राजकुमार,अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील,फैजपुर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत १६ संशयितांना अटक करण्यात आली होती.या सर्व संशयित आरोपींना काल दि.३ रोजी यावल न्यायालयात हजर केले असता न्या.एस.एम.बनचरे यांनी सर्व संशयीत आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.