Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
भारताच्या स्वातंत्र्यासाठी लाखो तरुणांनी ‘वंदे मातरम’ म्हणत फासावर लटकून घेतले ते वंदे मातरम गीत तुमचे आमचे राष्ट्रगीत नाही.१८९८ साली पंचम जॉर्ज राजाच्या स्वागतासाठी रवींद्रनाथ टागोर यांना ‘जन गण मन’ हे गीत सुचले असे विधान संभाजी भिडे यांनी नुकतेच केले आहे. ते रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते.१५ ऑगस्ट हे हांडगे स्वातंत्र्य असले तरी पत्करले पाहिजे.सबंध देशावर हिंदवी स्वराज्य येत नाही तोपर्यंत १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन दुःखाचाही आहे त्या दिवशी कडकडीत उपवास करायचा असेही ते म्हणाले.
या वर्षापासून १५ ऑगस्ट या दिवशी हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढून स्वातंत्र्यदिन साजरा करूया व या दिवशी कडकडीत उपवास करायचा.भगव्या झेंड्याला नैवेद्य दाखवून संध्याकाळी कोरभर भाकरी खायची व जो पर्यंत १५ ऑगस्ट साजरा करतो आहोत तोपर्यंत करायचे. ज्या दिवशी संबंध देशावर हिंदवी स्वराज्य येत नाही तोपर्यंत आमचा स्वातंत्र्य दिन दुःखाचाही आहे हे असे महाराष्ट्र करेल अन्य राज्यात असा विचार रुजायला वेळ लागेल दिल्लीवरती भगव्या झेंड्याचेच राज्य पाहिजे असेही संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.