पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-आजकाल लहान मुले आपल्या आई-वडिलांकडे एक ना अनेक कारणांसाठी हट्ट करत असतात आणि या हट्टापायी ही मुले टोकाचे पाऊल देखील उचलत असतात.अशाच पद्धतीची एक घटना बारामती तालुक्यातील क-हावागज या गावात घडली आहे.आईने मोबाईल दिला नाही या कारणावरून नाराज झालेल्या एका शाळकरी मुलाने चक्क गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
