Just another WordPress site

“दहा वर्षे स्वतः मोदी पंतप्रधान असूनही मणिपूरचे खापर नेहरूंवर फोडणे ही राजकीय दिवाळखोरीच”-ठाकरे गटाची सामनातुन टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ ऑगस्ट २३ शनिवार

 

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव आणला परंतु संख्याबळाच्या जोरावर हा ठराव पारित होणार नाही हे विरोधकांना माहिती असूनही मोदींना मणिपूर हिंसाचारावर बोलते करण्यासाठी विरोधकांनी हा ठराव मांडला.या ठरावावर भूमिका मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळपास दोन तासांहून जास्त वेळ भाषण केले व या भाषणावर विरोधकांकडून तीव्र शब्दांत टीका केली जात आहे.मोदींनी भाषणात फक्त काही मिनिटेच मणिपूरवर भाष्य केले असून इतर सगळा वेळ काँग्रेसवर टीका करण्यातच घालवला अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे यासंदर्भात ठाकरे गटाकडून मोदींना लक्ष्य करण्यात आले आहे.मोदींनी काँग्रेसवर टीका करणे ही राजकीय दिवाळखोरी असल्याची टीका ठाकरे गटाने सामनातील अग्रलेखातून केली आहे.मणिपूर समस्येचे खापर त्यांनी पंडित नेहरूंवर फोडले मग मागच्या दहा वर्षांत तुम्ही सत्ता भोगून काय केलेत? मोरारजी देसाई,अटल बिहारी वाजपेयी,व्ही.पी.सिंग हे बिगर काँग्रेसी पंतप्रधान झाले व आता दहा वर्षे स्वतः मोदी पंतप्रधान असूनही मणिपूरचे खापर नेहरूंवर फोडणे ही राजकीय दिवाळखोरीच. मणिपुरात महिलांची नग्न धिंड काढली जात असतांना मोदी पंतप्रधान आहेत व लोक मोदींना जाब विचारीत आहेत यात नेहरूंचा दोष काय? असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी संसदेत दिले.‘इंडिया’ पक्षाने आणलेल्या अविश्वास ठरावामुळे पंतप्रधानांना लोकसभेत येऊन बोलावे लागले.दोन तासांच्या भाषणात मणिपूरवर ते फक्त चार मिनिटे बोलले व बाकी सर्व पुराण तेच तेच आणि तेच त्यांनी काँग्रेसवरच लावले या त्यांच्या मानसिक यातना आहेत.पंडित नेहरूंचे जागतिक मोठेपण,काँग्रेसचे स्वातंत्र्य लढ्यातील कार्य या मोदींच्या यातना आहेत व दहा वर्षे सत्ता भोगूनही मोदी यातनांतून दूर होऊ शकलेले नाहीत अशा शब्दांत ठाकरे गटानं मोदींना लक्ष्य केले आहे.दरम्यान मोदींच्या एका वाक्यावरून ठाकरे गटाने मोदींना टोला लगावला आहे.आता मोदी म्हणतात मणिपुरात शांतीचा सूर्य उगवेल. तुम्ही सांगाल तेव्हा उगवायला सूर्य भाजपच्या मालकीचा आहे काय? अविश्वास ठरावाच्या निमित्ताने अनेकांचे मुखवटे गळून पडले व सत्ता पक्षाची चिडचिड अनुभवता आली.संसदेतून बाहेर फेकलेले राहुल गांधींचे भाषण हे त्या चिडचिडीमागचे मुख्य कारण.दहा वर्षांपूर्वीचे राहुल गांधी आज राहिलेले नाहीत.सत्यवचनी व बेडर गांधींसमोर मोदी-शहांच्या नेतृत्वाची कसोटी लागत आहे असेही अग्रलेखात म्हटले आहे.२०१४ व २०१९ असा दोन वेळा काँग्रेसचा पराभव करूनही या दोघांना २०२४ साली काँग्रेसची भीती वाटते व ते काँग्रेसवरच हल्ला चढवत आहेत हे त्यांचे मानसिक दौर्बल्य आहे.मणिपूर प्रश्नावर राजकारण न करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केले.मोदी यांनी २ तास १३ मिनिटांचे भाषण केले त्यात २ तास १० मिनिटे राजकारण व उरलेली ३ मिनिटे मणिपूर होते.अविश्वास ठरावाच्या दरम्यान मोदी-शहा हे पूर्ण काँग्रेसमय झाल्याचे दिसून आले असेही अग्रलेखात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.