अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.१९ ऑगस्ट २३ शनिवार
भारतीय स्वातंत्र्य हा काही कुबेराचे धन नाही ते मिळविण्यासाठी हजारो देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.इंग्रजी सत्तेच्या जोखडातून देश स्वतंत्र करण्यासाठी मोठा लढा द्यावा लागला त्याकरिता अनेक आंदोलने करावी लागली व तेव्हा कुठे आपल्याला स्वांतत्र्य मिळाले आहे. त्याकरिता लोकशाही व भारतीय संविधान जपले पाहिजे असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अनुष्का बेलोरकर यांनी नुकतेच केले आहे त्या अचलपूर तालुक्यातील हरिबाबा विद्यालयातील ध्वजारोहण प्रसंगी बोलत होत्या.यावेळी मंचावर माजी पशुसंर्वधन व दुग्ध विकासचे माजी उपसंचालक डॉ.डिल कडाणे,सामाजिक वनिकरणचे माजी उपसंचालक गणेश हिंगणीकर,पत्रकार व लेखक जयकुमार चर्जन,हरिबाबा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर जयस्वाल,सरपंच राहुल सालफळे,मुख्याध्यापक के.एस.जाधव उपास्थित होते.
यावेळी बोलतांना जयकुमार चर्जन म्हणाले की,आज देशाची वाटचाल हुकुशाहीच्या दिशेने सुरु असून महागाई,बेकारी,शेतकरी आत्महत्या असे अनेक प्रश्न आ वासून उभे असतांना आपण बोलले पाहिजे.कितेक महिन्यापासून आजही मणिपूर जळत आहे त्यावर पंतप्रधानांनी संसदेत चकार शब्दही काढला नाही तसेच मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली पण त्यावर सत्ताधारी बोलत नाही अशावेळी सर्वसामान्यांनी बोलले पाहिजे त्याचबरोबर बलाढ्य ब्रिटिशांना लोकांनी देशातून हाकलून लावले आज पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हा जनतेने सावध राहिले पाहिजे असे प्रतिपादन श्री.चर्जन यांनी यावेळी केले.प्रसंगी शाळेतील कार्यक्रमानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने वड,चिंच,लिंब,पिंपळ या दीर्यायुषी वृक्षांची लागवड करण्यात आली.यावेळी राहुल सालफळे,सरपंच राजकन्या मनवर,उपसरपंच संदीप आमझरे,ग्रामपंचायत सदस्य नामदेव हिरपुरकर,प्रल्हाद डाहे,मंजुषा आगे,मीना इंगळे,अमिता पोटे,ग्रामसेवक एन.एम.शाहा,लिपिक प्रभाकर धोपटे,राजेंद्र सरोदे,योगेश लोंदे,गंगाधर इंगळे,उद्धव येवकार,माणिकराव नान्हें,गजानन धाकडे,माजी सैनिक वसंतराव मुगल,गजाननभाऊ टापरे व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.