रेशनकार्ड समस्या निवारणाबद्दल नॅशनल अँटी करप्शन अँड कंट्रोल ब्युरोच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
रेशनकार्डबद्दल होणाऱ्या गैरसोयीचे निवारण करण्याबाबत पत्रकार अनिल गौर यांचे तहसीलदारांना निवेदनातुन साकडे
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२२ ऑगस्ट २३ मंगळवार
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहर येथील तहसील कार्यालय पुरवठा विभाग अंतर्गत नागरिकांच्या समस्या व तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असून यात नवीन रेशन कार्ड बनविण्याकरीता एक ते दीड वर्ष व नवीन नाव नोंदणी समाविष्ट व कमी करणे व ऑनलाइन सेटअप साठी कमीत कमी चार ते सहा महिने असा वेळेचा विलंब होत आहे अशा या वेळेच्या समस्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.परिणामी रेशनकार्डबाबतच्या अशा समस्या तात्काळ सोडविण्यात याव्या या मागणीचे निवेदन नॅशनल अँटी करप्शन अँड कंट्रोल ब्युरोच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.यात रेशनकार्डबद्दल होणाऱ्या गैरसोयीचे निवारण करण्याबाबत पत्रकार अनिल गौर यांचे तहसीलदारांना निवेदनातुन साकडे घातले असून तहसील प्रशासनाच्या वतीने सदरील समस्या तात्काळ सोडविण्यात येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
पत्रकार अनिल गौर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,नवीन रेशनकार्ड बनविण्याकरीता एक ते दीड वर्ष व नवीन नाव नोंदणी समाविष्ट व कमी करणे व ऑनलाइन सेटअपसाठी कमीत कमी चार ते सहा महिने असा वेळेचा विलंब होत असल्याने सदरील नागरिकांच्या घरातील ज्या व्यक्तींचे नाव रेशनकार्डमध्ये नाही असे नवीन नाव नोंदणी समाविष्ट केल्यास त्या व्यक्तींचे नाव लवकर ऑनलाइन सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांच्या मशिनात लवकर ऑनलाइन सेटअप येत नाही त्यामुळे त्यांना धान्य मिळत नाही तसेच कार्यालयात नवीन रेशनकार्ड बनविण्याकरीता दिल्यास एक ते दीड वर्षापर्यंत नवीन रेशनकार्ड मिळत नाही व नाव कमी करून पण लवकर मिळत नाही परिणामी विनाकारण वेळेचा अडथळा निर्माण केला जात असून या समस्यामुळे नागरिकांची मानसिकतेचा छळ होत आहे तसेच त्यांच्या भावना दुखावल्या जात आहे.सदरील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत सामाजिक कार्यांच्या आघाडीवर असलेली संस्था नॅशनल अँटी करप्शन कंट्रोल ब्युरोच्या वतीने आढावा घेऊन याबाबत तहसीलदार ऋणय जक्कलवार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी अमरावती जिल्हा अध्यक्ष अनिल शामलाल गौर पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा उपाध्यक्ष गजानन खंगार,जिल्हा कार्याध्यक्ष गणेश वानखडे,जिल्हा सचिव मंगेश चिलात्रे,सदस्य कपिल संजय उसरे,मोहम्मद सुफियान कुरेशी,श्रीकांत चिलात्रे,शुभम कहार,संजय धारस्कर,महादेवराव बाळे,अनिल काळे,देवानंद महल्ले,नितीन निंबोकार,संगीता मेण यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.