“नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लोकशाहीचा खून करत आहे”
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीका
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० डिसेंबर २३ बुधवार
वेलमध्येही न उतरता जागेवर उभे राहून प्रश्न विचारणाऱ्या १४१ खासदारांना निलंबित करणारे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लोकशाहीचा खून करत आहे असा आरोप करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली.विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले एकतर्फी निर्णय घेऊन केंद्र सरकार विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करीत आहे अशा रितीने देशाच्या इतिहासात प्रश्न विचारणाऱ्या खासदारांना कधीही निलंबित करण्यात आलेले नाही ही लोकशाहीची नुसती थट्टा नसून तिचा खून केल्यासारखे आहे.