“खोटे बोलण्याची स्पर्धा ऑलिंपिकमध्ये लागली तर नरेंद्र मोदींना सुवर्णपदक मिळेल”- संजय राऊत यांची खरमरीत टीका
संभाजी नगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ एप्रिल २४ शनिवार
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जहरी टीका केली असून मागच्या महिन्यात संजय राऊत यांनी मोदींची तुलना औरंगजेबाशी केली होती.आता आज त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी मोदींना गब्बर सिंगची उपमा दिली आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते संभाजीनगरमध्ये करण्यात आले त्यावेळी संजय राऊत यांनी मोदींवर बोचरी टीका केली.४०० पारचा नारा यांनी दिला आहे.लोकशाही काय तुमच्या बापाची आहे का ? जनता काय ठरवायचे ते ठरवणार आहे.मोदी २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान होणार नाहीत ही काळ्या दगडावारची पांढरी रेष आहे.नरेंद्र मोदींच्या पक्षाचे जे खाते आहे त्याची पहिली यादी जेव्हा जाहीर झाली तेव्हा गोमांस निर्यात करणाऱ्यांकडून ५५० कोटींच्या देणग्या देण्यात आल्या आहेत.मोदींना काश्मिरी पंडितांचे दुःख समजून घेणे गरजेचे वाटलेले नाही.या देशातले वातावरण असे आहे की मोदींनी २०० जागा जिंकल्या तरी खूप झाल्या.आपली इंडिया आघाडी कुठल्याही परिस्थितीत ३०० पार होईल असेही संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणतात की आमच्याकडे नरेंद्र मोदींचा चेहरा आहे मात्र तो चेहरा आहे की मुखवटा हे येणारा काळ ठरवेल हा चेहरा अत्यंत भयावह आहे.लोक घाबरत आहेत त्या चेहऱ्याला.भूत आले म्हणतात.लोकांना हा चेहरा नको आहे,गब्बर नंतर कुठल्या चेहऱ्याला लोक घाबरत असतील तर तो मोदींचा चेहरा आहे.शोलेमध्ये एक डायलॉग होता बच्चा सो जा नहीं तो गब्बर आ जायेगा त्याप्रमाणेच यांच्याबद्दल लोकांना वाटते आहे,कधीही टीव्हीवर येतील काहीही घोषणा करतील हा चेहरा लोकांना नको आहे.फडणवीसांना काहीही बोलू द्या पण भाजपाचे नेतृत्व ही भुताटकी आहे असे म्हणत संजय राऊत यांनी मोदींची तुलना शोलेतल्या गब्बरशी केली आहे.संभाजीनगर हे मराठवाड्याचे हृदय आहे या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय होईल.महाविकास आघाडीबाबत मराठवाडा मला पॉझिटिव्ह दिसतो आहे.कल्याण काळेंच्या मागे आपण सगळे ठामपणे उभे राहिलो तर रावसाहेब दानवे पुन्हा दिल्ली पाहणार नाहीत.आपण हवे तर दानवेंना मर्सिडिझने पाठवू पण त्यांच्या घरी पाठवू असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.एक नंबरचा खोटारडा पंतप्रधान आपल्या देशाला लागला आहे.खोटे बोलण्याची स्पर्धा ऑलिंपिकमध्ये लागली तर नरेंद्र मोदींना सुवर्णपदक मिळेल.आपले सरकार आले तर ही स्पर्धा आपण आयोजित करु आणि मोदींना पाठवू म्हणजे खोटे बोलण्यातले गोल्ड मेडल ते आणतील.मोदींइतके जलदगतीने खोटे बोलणारा माणूस मी पाहिलेला नाही असेही संजय राऊत म्हणाले.