‘महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या जसे की भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला व या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली असे या लेखात म्हटले आहे.दरम्यान या लेखावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर रतन शारदा यांनी टीव्ही ९ शी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.शरद पवार त्यांची मुलगी आणि पुतण्याच्या वादात त्रस्त होते.अजित पवार बाहेर पडल्यामुळे त्यांची अडचण दूर झाली असे रतन शारदा म्हणाले.तुम्ही व्यापक चित्र पाहिले तर ७० वर्षं या पक्षांनी नेहमी एकमेकांविरोधात निवडणुका लढल्या.विशेषत: महाराष्ट्रात जिथे समाजवादी विचार आणि काँग्रेस सातत्याने हिंदुत्ववादी विचारसरणीच्या विरोधात लढत राहिले.कोणत्याही ठिकाणी हिंदुत्ववादाला पुढे जाता येत नव्हते हा इतिहास आहे. या परिस्थितीत भाजपा क्रमांक एकचा पक्ष झाल्यानंतर त्यांचे मतदार राष्ट्रवादी काँग्रेसला मत देतील का ? राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सुरुवातीपासूनच ते या सगळ्या गोष्टी समजू शकले नाहीत.भाजपा,जनसंघाच्या विरुद्ध असणारी मते त्यांच्याकडे वळतील का ? स्पष्टच आहे की ही मते वळली नाहीत अशा शब्दांत रतन शारदा यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले.

दरम्यान ही युती शेवटच्या मतदारांना पसंतीस पडली नसल्याचे रतन शारदा म्हणाले.तुम्ही एकमेकांसोबत युती केली तरी शेवटच्या स्तरावरील मतदारांना ते पसंत पडलेले नाही.तुम्ही मतांची आकडेवारी पाहा.मी वेगळ सांगण्याची गरज नाही.एवढा संभ्रम आहे की मुस्लिमांच्या मतांवर उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकते.ज्यांच्या वडिलांनी सातत्याने प्रखर हिंदुत्ववादाचा विचार ठेवला.१९९३ च्या घटना लोक विसरले नाहीयेत ते जर मुस्लीम मतांनी जिंकले तर याचा अर्थ तिथे एकाच ठिकाणी मतांचे केंद्रीकरण झाले बाकी सगळी मते तर विभागली गेली असे विश्लेषण रतन शारदा यांनी केले.एकीकडे घड्याळ,एकीकडे हात,एकीकडे धनुष्यबाण,एकीकडे भाजपा…ही विचित्र परिस्थिती होती.दोन राष्ट्रवादी काँग्रेस, दोन शिवसेना होत्या.काँग्रेसचे लोक भाजपात,काही लोक काँग्रेसमधून बाहेर,काही लोक भाजपातून बाहेर.जेव्हा मतदार मत देण्यासाठी पोहोचला तेव्हा त्याला कळत नव्हते की माझे घड्याळ चिन्ह कुठे आहे,माझे मशाल चिन्ह कुठे आहे असेही रतन शारदा म्हणाले.

एकीकडे कार्यकर्त्यांची बांधीलकी एका नेत्याशी आहे,एका पक्षाशी आहे पण अचानक त्यांच्यासमोर दुसऱ्या पक्षाचा उमेदवार आला.सगळ्या पक्षांनी मतदारांच्या मनात निर्माण केलेला हा संभ्रम आहे त्याचा परिणाम भोगावा लागला.कदाचित दोन टक्के मते जास्त मिळाली असती तर फासे उलटे पडले असते.कदाचित निकालही वेगळा लागला असता.एकगठ्ठा मते फक्त मुस्लिमांची शिवसेनेला पडली बाकी सगळे संभ्रमात होते त्यामुळे नुकसान झाले असे शारदा यावेळी म्हणाले.सध्याचे संभ्रमाचे वातावरण निवळण्यासाठी राजकीय पक्षांना पुढाकार घ्यावा लागेल. एक समान कार्यक्रम राबवणे,महाराष्ट्राच्या विकासावर बोलणे,आपले स्पष्ट धोरण जनतेसमोर ठेवणे या गोष्टी कराव्या लागतील.इथे नेते इथून तिथे,तिथून इथे झाले पण कुणीही आपली ब्लू प्रिंट दिलेली नाही.जोपर्यंत ती समोर येणार नाही तोपर्यंत संभ्रम दूर कसा होईल ? ही अडचण आहे अशा शब्दांत त्यांनी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवरही भाष्य केले आहे.