प्राजक्ता माळींनी पत्रकार परिषद का घेतली?

सुषमा अंधारे म्हणाल्या,“फार शांतपणे आणि तटस्थपणे दोन-तीन मुद्दे मांडले पाहिजेत.मला असे वाटते की पहिला मुद्दा सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते.प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेणे हे मला अप्रस्तुत वाटले.त्यांनी पत्रकार परिषद का घ्यावी ? मित्र तुमच्याकडून स्पष्टीकरण मागत नाहीत आणि शत्रू तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत.पृथ्वीचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा असे म्हणून सोडून द्या.तुम्हाला स्पष्टीकरण का द्यावे वाटले ?”

“तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचेच होत तर करुणा मुंडे यांनी खरे आक्षेपार्ह विधान केले होते पण तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही.त्यांनी त्यावेळी दुर्लक्ष केले होते. आताही त्या दुर्लक्ष करू शकल्या असत्या.आता त्यांनी पत्रकार परिषद घेणे पॉलिटिकल मोटिव्हेटेड वाटते.महिलांना तुम्ही काय समजता.इथल्या जातपितृसत्ताक व्यवस्थेत बाईचे कर्तृत्व शून्य केले जाते पण हे प्राजक्ता माळीसारख्या अभिनेत्रीच्यावेळीच सुचते का ? जेव्हा सुषमा अंधारेंविरोधात बोलले गेले तेव्हा का सुचले नाही ? सुरेश धस यांच्याविषयी जी आखपाखड चालली आहे ते सुरेश धस कोणत्या पक्षाचे ? तुम्हाला सुरेश धस यांच्याविरोधात आगपाखड करण्याची गरजच नाही.सुरेश धस भाजपाचे आहेत.भाजपाची संस्था आरएसएस आहे.आरएसएसच्या मुख्यालयात प्राजक्ता जातात तेव्हाच त्या कलाकार राहत नाही कारण तेव्हा त्यांचा स्वतःचा एक पॉलिटिकल स्टॅण्ड तयार होतो त्यांचा राजकीय दृष्टीकोन तयार होतो” असे सुषमा अंधारे म्हणाल्या.कालच्या मोर्चाला काऊंटर करण्यासाठी प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद झाली.मोर्चाच्या चर्चा बाजूला सारण्याकरता पत्रकार परिषद घेतली.संतोष देशमुख हत्या प्रकरण बाजूला करण्यासाठी जाणीवपूर्वक प्राजक्ता माळीचे प्रकरण पुढे आणायचे हे का केले जाते ?” असे सुषमा अंधारे म्हणाल्या.