समुद्रातील काही विशिष्ट ठिकाणी दिसता क्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश !! मुंबईतील मच्छिमारांना सरकारचा सज्जड इशारा !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०९ मे २५ शुक्रवार
राज्यातील मत्स्य व्यवसाय विभागाने मच्छीमारांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केली असून मासेमारी करतांना काही गोष्टी टाळण्याबाबत इशारा देण्यात आला आहे.यात समुद्रातील संरक्षण विभागाच्या क्षेत्रात मासेमारी करु नका असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.यासोबत तेल विहिरींजवळ मासेमारी न करण्याचे आणि वादळात त्यांच्याजवळ आश्रय न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ऑफशोर डिफेन्स एरियामध्ये शूट टू किल अर्थात दिसता क्षणीच गोळी झाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे मच्छीमारांनी सहकार्य करावे असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाने केले आहे.दरम्यान राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छीमारांना काही सूचना दिल्या असून समुद्रातील काही विशिष्ट ठिकाणी मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे. सदरहू ही क्षेत्रे नौदल आणि तटरक्षक दलाच्या देखरेखेखाली आहेत त्यामुळे या भागात मासेमारी करणे धोक्याचे ठरू शकते या संदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत.
दरम्यान समुद्रात तेल विहिरी असतात व त्यांच्याजवळ मासेमारी करणे धोकादायक आहे तसेच वादळ आले तर अनेक जण तेल विहिरींजवळ आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात मात्र ते सुरक्षित नाही त्यामुळे तिथे थांबू नये असे सांगण्यात आले आहे.मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छीमारांना लायसन्स ऑफिसरना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे व याकठीणी मच्छीमारांनी सहकार्य करावे कारण किनारपट्टीचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांचीही आहे असेही मत्स्य विभागाने म्हटले आहे.केंद्र सरकारने नुकतेच एक सर्वेक्षण केले असून त्यानुसार महाराष्ट्राला ८७७.९७ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे व या किनाऱ्याचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावात गुरुवारी सायंकाळी मोठी वाढ झाली असून भारताच्या जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या (सॅम) प्रणालीने पाकिस्तानची क्षेपणास्त्रे व ड्रोन उद्वस्त केली.तर पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने भारताने पाडल्याचे वृत्त असून प्रत्युत्तरादाखल भारताने पाकिस्तानच्या अनेक शहरांवर हल्ले केले आहेत.देशाच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवर ‘इंटिग्रेटेड एअर डिफेन्स सिस्टीम’ सक्रिय केली आहे.पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने मंगळवारी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले.पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कण्यावर वज्राघात केल्यानंतर पाकिस्तान बिथरला असून पाक लष्कराने बुधवारी रात्री उत्तर आणि पश्चिम भारतातील १५ ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला परंतु सतर्क भारतीय सैन्याने हा प्रयत्न उधळवून लावला याशिवाय लाहोरमधील हवाई संरक्षण यंत्रणाही उद्ध्वस्त केली आहेत.