“भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला भारताविरूद्धचे युद्ध समजण्यात येईल” !! भारताचा अतिशय मोठा निर्णय !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० मे २५ शनिवार
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध चांगलेच ताणले गेले असून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तानने थेट सैन्याच्या तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती चिघळलेली आहे.दरम्यान भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला भारताविरूद्धचे युद्ध समजण्यात येईल असा अतिशय मोठा निर्णय भारताने घेतला आहे त्यामुळे भारताने दहशतवादाविरोधात अतिशय कठोर पवित्रा घेतला आहे.केंद्र सरकारमधील उच्चस्तरीय सुत्रांनी ही माहिती दिली असून केंद्र सरकारने घेतलेला निर्णय अतिशय महत्त्वाचा असून भारताने दहशतवादाविरोधातील लढाईत आपले धोरण बदलल्याचे द्योतक आहे.
दरम्यान भारताला अशांत करण्याच्या दृष्टीकोनातून पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने हल्ले घडवून आणतात व त्या हल्ल्यांना भारताकडून वेळोवेळी सडेतोड प्रत्युत्तरही दिले जाते मात्र तरीही दहशतवादी हल्ले थांबत नाहीत त्यामुळे भारताने यासंदर्भात आपली भूमिका बदलली असून भारताने धोरणात्मक बदल करत आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे.भविष्यात आमच्या जमिनीवर झालेला कोणताही दहशतवादी हल्ला आम्ही देशाविरूद्धचे युद्ध मानू आणि त्याला त्याचप्रकारे उत्तर देऊ अशी भूमिका भारताने घेतली आहे.भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी हल्ले उद्ध्वस्त केले व त्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर देतांना भारताच्या सैनिकी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला या पार्श्वभूमीवर भारताने दहशतवादाविरोधात कठोर निर्णय घेतला आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तानचे सैन्य सीमावर्ती भागाकडे कूच करत आहे अशी माहिती केंद्राकडून आधीच देण्यात आलेली आहे.कर्नल सोफिया कुरेशी यांनी विंग कमांडर व्योमिका सिंग आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्यासोबत सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची माहिती दिली आहे.