भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष अखेर थांबला !! पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताने शस्त्रसंधीचा निर्णय घेतला !!
नवी दिल्ली-पोलीस नायक :-
दि.१० मे २५ शनिवार
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष अखेर थांबला असून पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताने शस्त्रसंधीचा निर्णय घेतला आहे व या वृत्ताला पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी दुजोरा दिला आहे.भारतासोबत शस्त्रसंधी झाल्याची माहिती डार यांनी दिली आहे.आज दि.१० मे शनिवार रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून शस्त्रसंधी झालेली आहे.भारत आणि पाकिस्तानचे लष्करी अधिकारी १२ मे रोजी बैठक घेणार आहेत व दोन्ही देशांनी थेट चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे भारताकडून सांगण्यात आले आहे.पाकिस्तानच्या विनंतीवरुन सैनिकी कारवाई थांबवल्याचे भारत सरकारकडून सांगण्यात आले आहे.
यासंदर्भात भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी माहिती दिली की,पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारतीय लष्कराच्या महासंचालकांना फोन केला व दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ५ वाजल्यापासून जमिनीवर,हवेत आणि समुद्रात सुरु असलेला गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.परिणामी आजपासून सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आल्या आहेत.लष्कराचे ऑपरेशन्स महासंचालक १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करतील.दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदीसाठी मध्यस्थी केल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असून त्यांनी याबद्दल एक्सवर एक पोस्ट केली आहे.अमेरिकेने काल रात्रभर मध्यस्थीसाठी बोलणी केली व त्यात भारत आणि पाकिस्तान पूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधीसाठी तयार झाले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो अशी माहिती ट्रम्प यांनी दिली आहे.पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी देखील सोशल मीडियावर याबद्दल महत्त्वाची माहिती दिली असून भारत आणि पाकिस्तानने तत्काळ शस्त्रसंधी करण्याबद्दल सहमती दर्शवली.पाकिस्तानने कायमच प्रदेशातील शांतता आणि सुरक्षेसाठी प्रयत्न केले आहेत.दक्षिण आशियात शांतता नांदावी यासाठी आम्ही नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे असे डार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.पहलगामध्ये २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध ताणले गेले होते.
भारत-पाक तणाव निवळला !! ट्रम्प यांचा महत्त्वाचा दावा !!
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेला संघर्ष संपण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत यासंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीचा दावा केला आहे.दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार झाल्याचे ट्रम्प यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे ट्रम्प यांनी याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन केले आहे.भारत आणि पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न राष्ट्र आहेत त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्यास त्याचे परिणाम जगावर होऊ शकतात त्यामुळेच अमेरिकेने यामध्ये मध्यस्थी केली.याबद्दल ट्रम्प यांनी एक पोस्ट केली असून ‘अमेरिकेने काल रात्रभर मध्यस्थीसाठी बोलणी केली व त्यात भारत आणि पाकिस्तान पूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधीसाठी तयार झाले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो’ अशी माहिती ट्रम्प यांनी दिली आहे.
— Donald J. Trump (@realDonaldTrump) May 10, 2025
प्रदिर्घ वेळ झालेल्या चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधी आणि युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवल्याचे ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची माहिती देताना केलेल्या पोस्टची वेळ अतिशय महत्त्वाची आहे.भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाचे परिणाम जागतिक पातळीवर दिसू लागले आहेत.पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी देखील सोशल मीडियावर याबद्दल महत्त्वाची माहिती दिली असून ‘भारत आणि पाकिस्तानने तत्काळ शस्त्रसंधी करण्याबद्दल सहमती दर्शवली.पाकिस्तानने कायमच प्रदेशातील शांतता आणि सुरक्षेसाठी प्रयत्न केले आहेत.दक्षिण आशियात शांतता नांदावी यासाठी आम्ही नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे’ असे डार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.पहलगामध्ये २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध ताणले गेले होते.भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव विकोपाला गेलेला असतांना अचानक शस्त्रसंधी झाली यामागे भारताची मोठी कूटनिती आहे.विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या अमेरिकन समकक्षांसाठी संवाद साधत होते व सीमेवरील तणाव संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते त्याला अखेर यश मिळाले आहे.