दर्जाहिन कामामुळे व अपूर्ण असलेल्या कामाच्या ठिकाणी महामार्गास खड्डे पडले.काम पूर्ण झालेल्या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना त्यामध्ये थर्मोप्लास्टीक पेंट (पांढ-या पट्टया),कॅट आईज,डेलीनेटर,वाहन चालकांच्या माहितीसाठीचे माहिती,सूचना फलक लावणे, अनधिकृत रस्ते दुभाजक बंद करणे आवश्यक होते हे काम केले नाही त्यामुळे या महामार्गावर  अपघात होऊन होऊ लागले.२०२० पासून एकूण १७० मोटार अपघात झाले  त्यामध्ये एकूण ९७ प्रवाशांच्या मृत्यूस झाला.२०८ प्रवाशी जखमी झाले  त्याचप्रमाणे वाहनाचे नुकसान झाले आहे त्यामुळे या ठेकदार कंपनी विरुद्द मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.पुढील अधिक तपास रायगडचे पोलीस अधिक्षक  सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार  करीत आहेत.