सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ जानेवारी २५ सोमवार
देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम आहेत अशी टीका काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागल व त्यानंतर महायुतीला महाप्रचंड असे २३७ जागांचे बहुमत मिळाले याबाबतच्या प्रतिक्रिया सातत्याने आल्या होत्या व अजूनही त्याबाबतच्या प्रतिक्रिया येतांना दिसत आहेत. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.प्रणिती शिंदे म्हणाल्या,वाढलेल्या मतदार संख्येच्या आकडेवारीवर आम्ही शंका उपस्थित केली आहे.२०१९ ते २०२४ दरम्यान मिळालेल्या आकडेवारीनुसार जवळपास ५ लाख मतदार संख्या वाढली होती.लोकसभा निवडणूक २०२४ ते विधानसभा निवडणूक २०२४ दरम्यान ७५ लाख मतदार संख्या कशी काय वाढली ? असा प्रश्न प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला आहे व जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत आमचा विश्वास बसणार नाही असेही त्या म्हणाल्या तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम-प्रणिती शिंदे !!
लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली होती.शांतीत क्रांती करु असे लोक म्हणाले होते.लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांनी कट-कारस्थान केले.चार महिन्यांत मतदार इतके कसे काय वाढले हा आमचा सरळ प्रश्न आहे.देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठ्यांच्या तीव्र भावना होत्या.आता देवेंद्र फडणवीसच त्यांच्यावर मुख्यमंत्री म्हणून थोपवले गेले आहेत.ईव्हीएम सीएम असंच देवेंद्र फडणवीस यांना म्हणता येईल अशी बोचरी टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे अनेक योजना थांबवण्यात आल्या आहेत-प्रणिती शिंदे !!
लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्यामुळे अनेक योजना थांबल्या आहेत.केंद्र शासनाचा जो निधी मिळतो त्यापैकी ७० टक्के निधी अद्याप मिळालेला नाही.रस्त्यांची कामं अनेक ठिकाणी थांबवण्यात आली आहे.संजय गांधी निराधार योजनेचा निधी जवळपास ६० टक्के रक्कम आलेली नाही.अनेक कामे थांबवण्यात आली आहे. महाराष्ट्र दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे आणि त्याला जबाबदार भाजपा आहे असाही आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी राष्ट्रीय मतदारदिना निमित्त काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली.केंद्रीय निवडणूक आयोग हे भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे कामकाज करत आहेत.केंद्रीय निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे तरीही या संस्थेवर भयंकर अशा दबाव तंत्राचा वापर केला जात आहे असे खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.