Just another WordPress site

बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर किनगाव गावाजवळील पुलावर कठडे नसल्याने अपघातास आमंत्रण !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-

दि.०८ फेब्रुवारी २५ शनिवार

गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन प्रमुख राज्याच्या सिमेला लागुन असलेल्या व कायम वाहनांची वर्दळ असलेल्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर किनगाव पासुन चोपड्याकडे जातांना महामार्गावरील पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण कठडेच नसल्याने मोठ्या अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान किनगाव पासुन चोपड्याकडे जातांना किनगाव ग्रामीण रुग्णालय शेजारी बुरहाणपुर अंकलेश्वर महामार्गावर असलेल्या पुलाजवळ पुर्व पश्चिम दोन्ही बाजूला संरक्षण कठडे अपुर्ण बांधण्यात आल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

या रस्त्यावर दिवसभरात हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते जवळच यावल कृषी उत्पन्न उपबाजार समिती आहे त्यामुळे नेहमी या पुलाच्या काही अंतरावर नेहमी वाहनांन सह नागरीकांची वर्दळ सुरू असते त्याचप्रमाणे ब-हाणपुर अंकलेश्वर महामार्गावर दररोज शेकडो केळी व इतरही साहीत्य नेआण करणाऱ्या वाहने राज्य परीवहन महामंडळा च्या बसेस,खाजगी चारचाकी व दुचाकी वाहनांची वर्दळ सुरू असते.पुलाचे बांधकाम करतांना पुलाचे कठडे तर आहेत परंतु पुलाचे कठडे टाकतांना पुलाचे पुढे व मागे दहा ते पंधरा फुटांपर्यंत संरक्षण कठडे सुरूवातीपासुनच बांधलेले नाही त्यामुळे जेथुन पुल प्रारंभ होतो तेथुन संरक्षण कठडे बांधकाम करणे जरूरीचे आहे.पुलाचे अशा दोन्ही बाजूला संरक्षण कठडे नसल्याने गाडी खाली पंधरा ते वीस फूट खोल नाल्यात पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या पुलाजवळ मोठया प्रमाणावर झाडे होती मात्र ती तोडल्याने पुलाचे दोन्ही बाजूला मोकळीक निर्माण झाली आहे त्यामुळे वाहनचालक पुलाच्या कठडे नसलेल्या बाजुजवळुनच वाहने येणे जाणे करतात त्यामुळे वाहन चालकांचे थोडे ही वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहने थेट नाल्यात पडल्यासमोठया अपघात होवुन निरपराधांचा जिव जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण करीता संरक्षण कठडे अजुन पुढे दहा फुटांपर्यंत बांधण्यात यावीत अशी मागणी परीसरा ग्रामस्थांसह वाहनचालक यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.