मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२३ मार्च २५ रविवार

राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर आणि नागपूर हिंसाचारामुळे तणावाचे वातावरण असून राज्यात दोन गटात तणावाची पार्श्वभूमी असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करत मुस्लीम समुदायाशी संवाद साधला.मुस्लीम समुदायाला धमकी देण्याचा किंवा जातीय तेढ करण्याचा प्रयत्न केला तर अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला होता.दरम्यान अजित पवार यांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून फडणवीस यांनीही चांगले काम करणाऱ्या आणि देशभक्त व्यक्तीला कोणी त्रास दिला तर त्याला सोडणार नसल्याचे म्हटले आहे.