दरम्यान पोलिसांकडून आरोपींवर कारवाई होत नसल्यामुळे आरोपी मोकळे सुटले असून आरोपींना पोलिसांची भीती राहिलेली नाही.महिलांसाठी २०२२ मध्ये ‘मिशन शक्ती’अभियान राबविले गेले व त्यासाठी प्रस्तावित रकमेच्या फक्त २२ टक्के रक्कम खर्च झाली असा आरोपही दानवे यांनी केला.राज्यातील कारागृहांमध्ये कैदी कोंबून भरले आहेत.कारागृहांतील बंदींची क्षमती २७ हजार असतांना आजघडीला कारागृहात ४३ हजार कैदी आहेत व क्षमतेपेक्षा १६ हजार कैदी जास्त असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.‘जो भाजपच्या विरोधात त्याच्यावर गुन्हे’ अशी पद्धत सध्या राबविली जात असून मानवाधिकार आणि शवविच्छेदन अहवालामध्ये पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला असे स्पष्टपणे म्हटले आहे व तरीही सूर्यवंशीला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तसेच गुन्हा दाखल झाल्यावर तत्काळ मंत्र्याच्या मुलाचे विमान वळविले जाते.पण संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे असे का होते.भोकरदनमध्ये एका तरुणाला चटके दिले गेले.पोलिसांना पुरावे दिले तरी आरोपी सापडत नाही.मात्र या प्रकरणी त्या ठिकाणी नसलेल्या शिवसेनेच्या नवनाथ दौड या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत. जो भाजपच्या विरोधात जाईल त्याच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला आहे.