थोडक्यात वाचला आहात त्यामुळे जरा जपून… !!

“कोकाटे साहेब,कर्जमाफीचा पैसा बँकांना जमा होतो शेतकऱ्यांना मिळत नाही हे कदाचित आपल्याला ज्ञात नसावे.कर्जमाफीचा पैसा साखरपुडा,लग्नकार्यात खर्च करणे हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्याएवढे सोपे नाही.मुळात सदनिका प्रकरणात बुडाखाली अंधार असतांना शेतकऱ्यांना ब्रम्हज्ञान देण्याची गरजेचे नाही” अशी बोचरी टीका रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये केली आहे.रोज कोट बदलणाऱ्या कृषिमंत्र्यांना शेतकऱ्याचा फाटलेला सदरा दिसत नसला तरी आपल्या वादग्रस्त संवेदनांचे प्रदर्शन करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यापेक्षा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रित क तर अधिक बरे होईल. राजकीयदृष्ट्या थोडक्यात वाचला आहात त्यामुळे जरा जपून…” असा इशाराही रोहित पवारांनी कोकाटे यांना दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की कर्जमाफी होऊ शकत नाही ? मग शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही ? असा सवाल एका शेतकऱ्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारला होता व या प्रश्नाचे उत्तर देतांना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की,“मग जे नियमित कर्ज भरतात त्यांनी का बर कर्ज भरावे ? कर्ज घ्यायचे आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहायची तोपर्यंत कर्जभरायचे नाही.”पुढे कोकाटे म्हणाले की,“मला एक सांगा,आता येथे मीडिया आहे. मीडियासमोर असे बोलत नाही पण तुम्ही मला सांगा. तुमची (शेतकर्‍यांची) कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचे तुम्ही काय करता ? शेतीमध्ये एक रुपयांची तरी गुंतवणूक करता का ? सरकार तुम्हाला आता शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे देणार आहे.सरकार तुम्हाला पाईपलाईनाला पैसे,सिंचनासाठी पैसे,शेततळ्यासाठी पैसे देणार आहे.सरकार भांडवली गुंतवणूक करते मग शेतकरी भांडवली गुंतवणूक करतात का ? शेतकरी म्हणतात,पीक विम्याचे पैसे पाहिजे मग त्यातून साखरपुडे करा,लग्न करा” असे म्हणत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावले.