पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी येथे आज दि.३१ मे रोजी आहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर असतांना या कार्यक्रमात बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव आहिल्यादेवी होळकर नगर असे व्हावे अशी इच्छा व्यक्त केली असतांना त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच त्यांच्या भाषणात घोषणा केली की सर्वांची इच्छा आहे त्यामुळे आपण अहमदनगरचे नाव बदलून आहिल्यादेवी होळकर नगर असे केले जाणार असून याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,आहिल्यादेवींचे माहेरचे आडनाव शिंदे आहे आणि मी पण शिंदेच आहे.आज येथे रामभाऊ शिंदे व गोपीचंद पडळकर यांनी मागणी मांडली तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझीही तीच इच्छा आहे तसेच तुमच्या सर्वाच्या इच्छेखातर अहमदनगर जिल्ह्याचे नाव आहिल्यादेवी होळकर नगर असे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की,आहिल्यादेवींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत आहोत.आज हा ऐतिहासिक सोहळ्याला मी उपस्थित आहे.देवेंद्र फडणवीस आणि मी येथे उपस्थित असल्याचा मला खूप अभिमान आहे.आहिल्यादेवींच कर्तृत्व हिमायलाएवढे मोठे असून त्यामुळेच या अहमदनगरला त्यांचे नाव दिले जाईल हा निर्णय आमच्या सरकारच्या काळात घेतला जातोय हे आमचे भाग्य आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.