मोबाइल दुकानात ग्राहक बनून आलेल्या चौघांचा तरुणावर हल्ला !!

मोबाईल दुकानात ग्राहक बनून आलेल्या हल्लेखोरांनी १०० रुपयांचे स्क्रीन गार्ड ५० रुपयांना मागितले होते मात्र दुकानातील कामगाराने ते ५० रुपयांत देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला त्यातूनच चार तरुणांनी चाकू आणि कोयत्याने वार करत दुकानातील कामगाराचा निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेनंतर सांगली शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व त्यानंतर तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासात हल्लेखोरांना अटक केली आहे.मात्र क्षुल्लक कारणावरुन झालेला वाद एका कुटुंबावर मोठा दु:खाचा आघात देऊन गेला.घरातील कर्ता तरुण गेल्याने गोस्वामी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.दरम्यान या खुनाच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे,अप्पर अधिक्षक रितू खोखर,उपविभागीय अधिकारी विमला एम,पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.सांगली शहर पोलिसांनी काही तासात हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.