यावल अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची निकष व गुणांकन यादी ७ मार्च रोजी प्रसिद्ध होणार !! प्रकल्प अधिकारी अर्चना अटोळे यांची माहिती !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०४ मार्च २५ मंगळवार
तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना बालविकास प्रकल्प यावल विभागाअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांसाठी प्राप्त अर्जाची छाननीची प्रक्रिया सुरु असून दि.७ मार्च २०२५ या दिवशी अर्जदारांना किती गुण प्राप्त झाले यासंदर्भात प्राथमिक यादी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यावल येथे लावण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक रित्या बोलताना सांगितले.दरम्यान एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय यावल मार्फत सरळ भरतीद्वारे शासनाच्या निर्णयानुसार ३ अंगणवाडी सेविका जागांसाठी २५ अर्ज आले होते तर ४७ मदतनीसांसाठी ४६४ अर्ज प्राप्त झाले होते.शासनाच्या नियमावलीनुसार इच्छुक अर्जदारांना शासनाने ठरवून दिलेल्या चौकटीनुसार त्यांना गुण देण्यात येत आहेत व हे गुण शासनाने नियुक्त केलेल्या पडताळणी समितीतर्फे देण्यात येणार असून सदर समिती शासन निर्धारित असून शासन निर्णयानुसारच कामकाज करते.याठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनीस या जागांसाठी अर्जदारांनी कोणाच्याही अमिषाला आणि भूलथापांना बळी पडू नये आणि कोणी उलट सुलट माहिती देत असेल तर अशा माहितीला कुणीहि थारा देऊ नये.उमेदवारांना मिळालेल्या गुणांकनानुसारच अर्जाची छाननी होणार असून कुणावरहि कुठल्याच प्रकारचा अन्याय होणार नाही याची हमी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यावल श्रीमती अर्चना आटोळे यांनी दिली आहे.
दरम्यान प्राथमिक यादी ७ मार्च २०२५रोजी कार्यालयच्या बोर्डावर व पंचायत समितीच्या बोर्ड वर व रिक्त जागाच्या ग्रामपंचायतिच्या बोर्डवर गुणांकन झालेली यादी प्रसिद्ध करण्यात येईल.ज्यांना कोणाला या यादीमधील निवडीवर किंवा गुणांवर हरकत घ्यायची आहे त्यांनी दि.७ मार्च २०२५ ते २१ मार्च २०२५ पर्यंत कार्यालयाशी संपर्क साधावा.२१ मार्च २०२५ च्या नंतर आलेल्या हरकतीवर कुठल्याच प्रकारची दखल घेतली जाणार नाही.या पदासाठी परिपूर्ण गुणवत्ता व निकषात पात्र असलेल्या उमेदवारांची अंतीम निवड यादी २४ मार्च २०२५ रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहीती एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय यावलच्या माध्यमातुन कळविण्यात आले.संपूर्ण तालुका स्तरातून याची मोठी प्रसिद्धी झाली त्यामुळे एवढ्या इच्छुक अर्जदारांना प्रत्यक्ष अर्ज भरता आला आहे.सदर भरती निपक्षपातीपणाने व विहित शासन निर्णयानुसारच होणार असल्याची ग्वाही एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यावल श्रीमती अर्चना आटोळे यांनी माहिती देतांना दिली आहे.