याचबरोबर विधानपरिषदेचे सदस्य सतेज ऊर्फ बंटी पाटील,अभिजित वंजारी,भाई जगताप,जयंत आसगावकर,राजेश राठोड,धीरज लिंगाडे,डॉ. प्रज्ञा सातव,मिलिंद नार्वेकर,सुनिल शिंदे यांनी एमपीएससी संदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले होते.यावेळी एमपीएससीमार्फत होणारी पदभरती आणि पारदर्शकता व पेपरफुटीवरही प्रश्न विचारण्यात आले होते.यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली आहेत.यावेळी शासनाने रिक्त पदे भरण्यासाठी घोषणा करुनही १५ पेक्षा जास्त विभागात भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही तसेच तलाठी व जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया राबविल्यानंतर उमेदवार पात्र होऊनही त्यांना नियुक्तीचे पत्र दिले नाही हे ही खरे आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.याला उत्तर देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,“तलाठी तसेच जिल्हा परिषदेतील पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जात नाहीत तसेच नियुक्ती पत्र देण्याची कार्यवाही देखिल आयोगामार्फत केली जात नाही त्यामुळे या विषयाचा आयोगाच्या मनुष्यबळाशी कोणताही संबंध नाही.”